शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

२० हजार गावे होणार दुष्काळमुक्त

By admin | Updated: October 19, 2016 01:39 IST

राज्यात पुढील चार वर्षांमध्ये २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

बारामती : राज्यात पुढील चार वर्षांमध्ये २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेततळी दिली जाणार आहे. त्यासाठी पैसेवारीची असणारी अट हटवण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी दिली. माळेगाव येथे अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी विषयक पत्रकारांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. देशमुख पुढे म्हणाले, की जास्तीत जास्त ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पाण्याच्या अतिवापरामुळे पश्चिम महाराष्ट्रातील जमिनी खारपड होत आहेत. त्यासाठी जास्तीत जास्त ऊस शेती ठिबक सिंचनाखाली आणली जात आहे. ऊस शेती बंद करा, असेही काही जण सांगत आहे. परंतु असे होणार नाही. राज्यातील संपूर्ण सहकारक्षेत्र उसावर अवलंबून आहे. या क्षेत्राचे अर्थकारण उसावर चालत आहे. राज्य शासनाचेही असे कोणतेही धोरण नाही. सध्या उसाचे १ ते १.५ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनावर आहे. यामध्ये वाढ करून भविष्यात उसाचे ३ लाख क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे देशमुख यांनी सांगितले. या वेळी अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, आदर्श गाव प्रकल्प समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार, समन्वयक प्रल्हाद जाधव, रोहित पवार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)>शेतकऱ्यांसाठी थेट शेतमाल विक्री परवानापणन व कृषी विभागाच्या सहकार्याने राज्यात ८४२ शेतकरी कंपन्या सुरू करण्यात आल्या आहेत. यातील १०० शेतकरी कंपन्यांना थेट शेतमाल विक्रीचा परवाना देण्यात आला आहे. राज्यातील शेतकरी कंपन्या अद्यापही सक्षम झाल्या नाहीत. राज्यात ३५० कंपन्यांना बिझनेस प्लॅनसाठी १२ कोटी रुपये निधी दिलेला आहे, अशी माहितीही विकास देशमुख यांनी दिली. राज्यामध्ये २ हजार ६५ स्वयंचलित हवामान केंदे्र उभारली जाणार आहेत. त्यामुळे त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना हवामानासंबंधी माहिती जलद मिळण्यास मदत होईल. तसेच हवामानाच्या बदलानुसार पीकपद्धती व पिकांची काळजी घेणे सोपे होईल, असेही देशमुख यांनी सांगितले.