शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
5
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
6
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
7
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
8
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
9
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
10
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
11
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
12
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

आरटीई प्रवेशापासून २० हजार विद्यार्थी वंचित

By admin | Updated: September 8, 2015 01:23 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी राज्यभरातून ३० हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १० हजार विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्याप

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेशासाठी राज्यभरातून ३० हजार अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी केवळ १० हजार विद्यार्थ्यांचीच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, अद्याप २० हजार विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा उजाडल्यानंतरही, प्रवेशाची पहिली फेरीही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या फेरीच्या तारखा जाहीर कधी होणार आणि प्रवेश प्रक्रिया राबवली कधी जाणार, याबाबत पालक प्रश्न उपस्थित करीत आहेत. दरम्यान, पुण्यातील पहिली प्रवेश फेरी रखडलेली असल्याने ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच दुसऱ्या फेरीचे नियोजन जाहीर होणार आहे. पुणे विभागाचा परिणाम राज्यातील विद्यार्थ्यांवर होणार आहे. दुसरीकडे लातूर, अमरावती, नागपूर, नाशिक, पनवेल, कोल्हापूर या विभागांची प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. या विभागांकडून दुसऱ्या फेरीची तारीख त्वरित जाहीर करावी ही मागणी होत आहे. मात्र सर्व विभागातील पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी जाहीर करता येत नसल्याने अद्यापही २० हजार विद्यार्थी आरटीई प्रवेशांच्या प्रतीक्षेत आहेत.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्राथमिक व पहिलीच्या प्रवेशासाठी २५ टक्के आरक्षित जागेवर दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंबंधी उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यासाठी राज्यातून या जागांसाठी ३० हजार अर्ज आले होते. त्यातील पहिल्या फेरीसाठी १० हजार अर्जांची प्रक्रिया सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)