शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

२० टक्के गुणांचा प्रस्ताव नामंजूर

By admin | Updated: December 28, 2015 04:10 IST

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक असावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्य शासनाकडे सादर केला होता

पुणे : दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक असावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्य शासनाकडे सादर केला होता. मात्र, शासनाने तो नामंजूर केला आहे. त्यामुळे लेखी परीक्षेत ५ किंवा १० गुण मिळविणारे विद्यार्थी ग्रेस गुणांच्या मदतीने उत्तीर्ण होणार आहेत. परिणामी, यंदाही दहावी, बारावीचा निकाल उच्चांकी लागेल, हे स्पष्ट झाले आहे.काही वर्षांपासून राज्य मंडळातर्फे ८०/२० ‘पॅर्टन’नुसार दहावी - बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. ८० गुणांच्या लेखी आणि २० गुणांच्या तोंडी परीक्षेत मिळालेल्या गुणांची बेरीज करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाते. काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत २० पैकी २० गुण दिले जातात. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून ग्रेस गुणही दिले जातात. त्यामुळे लेखी परीक्षेत ५ किंवा १० गुण मिळूनही लाखो विद्यार्थी सहज उत्तीर्ण होत आहेत, असे मंडळाच्या लक्षात आले होते. हे योग्य नसल्याने राज्य मंडळाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याचे बंधन घालण्याचा निर्णय घेतला होता. सत्ताबदल झाल्याने मंडळाने नवीन शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र शासनाने प्रस्ताव नामंजूर केल्याने दहावी - बारावीचा निकाल यंदाही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विज्ञान विषयांची गुण विभागणी ७०/३० अशी आहे. त्यातही स्वतंत्र पासिंग असायला हवे, अशी भूमिका काही शिक्षक संघटनांनी घेतली होती. स्वतंत्र पासिंग ठेवल्यास बोर्डाचा निकाल खाली येण्याची शक्यता असल्याने प्रस्ताव नाकारण्यात आला असावा, असे बोलले जाते. (प्रतिनिधी)