शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

२० टक्के गुणांचा प्रस्ताव नामंजूर

By admin | Updated: December 28, 2015 04:10 IST

दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक असावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्य शासनाकडे सादर केला होता

पुणे : दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक असावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्य शासनाकडे सादर केला होता. मात्र, शासनाने तो नामंजूर केला आहे. त्यामुळे लेखी परीक्षेत ५ किंवा १० गुण मिळविणारे विद्यार्थी ग्रेस गुणांच्या मदतीने उत्तीर्ण होणार आहेत. परिणामी, यंदाही दहावी, बारावीचा निकाल उच्चांकी लागेल, हे स्पष्ट झाले आहे.काही वर्षांपासून राज्य मंडळातर्फे ८०/२० ‘पॅर्टन’नुसार दहावी - बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. ८० गुणांच्या लेखी आणि २० गुणांच्या तोंडी परीक्षेत मिळालेल्या गुणांची बेरीज करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले जाते. काही शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेत २० पैकी २० गुण दिले जातात. अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून ग्रेस गुणही दिले जातात. त्यामुळे लेखी परीक्षेत ५ किंवा १० गुण मिळूनही लाखो विद्यार्थी सहज उत्तीर्ण होत आहेत, असे मंडळाच्या लक्षात आले होते. हे योग्य नसल्याने राज्य मंडळाने लेखी परीक्षेत २० टक्के गुण मिळविण्याचे बंधन घालण्याचा निर्णय घेतला होता. सत्ताबदल झाल्याने मंडळाने नवीन शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव पुन्हा मंजुरीसाठी सादर केला होता. मात्र शासनाने प्रस्ताव नामंजूर केल्याने दहावी - बारावीचा निकाल यंदाही ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लागेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विज्ञान विषयांची गुण विभागणी ७०/३० अशी आहे. त्यातही स्वतंत्र पासिंग असायला हवे, अशी भूमिका काही शिक्षक संघटनांनी घेतली होती. स्वतंत्र पासिंग ठेवल्यास बोर्डाचा निकाल खाली येण्याची शक्यता असल्याने प्रस्ताव नाकारण्यात आला असावा, असे बोलले जाते. (प्रतिनिधी)