शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण अनिवार्य

By admin | Updated: November 19, 2014 10:23 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे.

दहावी-बारावी : मार्च २०१६पासून निर्णयमुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २0 टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २0१६पासून लागू केला जाणार आहे.सध्या दहावीची तोंडी परीक्षा २0 गुणांची, तर लेखी परीक्षा ८0 गुणांची घेण्यात येते. बारावीला ३0 गुणांची तोंडी वा प्रात्यक्षिक आणि ७0 गुणांची लेखी परीक्षा असते. परंतु नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. दहावीच्या तोंडी परीक्षेत विद्यार्थ्याला २0पैकी २0 गुण मिळाले आणि तोंडी तरीक्षेत १५ गुण मिळाले तर विद्यार्थी पास होत असे. मात्र, नवीन नियमानुसार असे ३५ गुण मिळालेला विद्यार्थी उत्तीर्ण मानला जाणार नाही. विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. परीक्षा पद्धतीमधील बदलाबाबतच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने हा निर्णय मार्च २0१६च्या परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.