शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

सात रूपयांत २० लीटर शुध्द पाणी

By admin | Updated: June 8, 2016 05:03 IST

घोडबंदरच्या प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी तेही अवघ्या सात रुपयात २० लीटर इतक्या प्रमाणात उपलब्ध झाले

ठाणे : घोडबंदरच्या प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी तेही अवघ्या सात रुपयात २० लीटर इतक्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. याचा लाभ आजूबाजूच्या सोसायटींसह झोपडपट्टी परिसराला होणार आहे. ठाणे महापालिका, वॉटर लाईफ इंडिया आणि डिटो फाउंडेशनतर्फे या प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. ठाणे महापालिकेने दोन वर्षापूर्वी या प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली होती. त्याला आज प्रत्यक्ष सुरूवात झाली. यावेळी डिटो फाऊंडेशन आणि वॉटर लाईफ इंडियाचे झेंडर वॅन मिरविझिक, शहाना भौमिक, सुदेश मेनन, इंद्रायणी दास, मोहन रानबोअरे, भावना मनोहर डुंबरे आणि स्थानिक नगरसेविका बिंदु मढवी आदी उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नातून आणि महापालिकेने घेतलेल्या पुढाकारामुळे ठाण्यातील १० मधील पहिला प्रकल्प हा विजयनगरी भागात सुरु झाला आहे. बोअरवेलमधील पाणी येथील फिल्टरेशन प्लॅन्टमध्ये टाकले जाते आणि ते शुध्द करुन पाण्याच्या टाकीत सोडले जाते. येथे पाणी घेण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना स्मार्ट कार्ड स्वॅप करुन पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या प्रक्रियेनंतर दररोज २४ हजार लीटर पाणी या टाकीत उपलब्ध होणार असल्याची माहिती अर्पण फाऊंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी दिली. तसेच स. ७ ते दु. १२ आणि सायं. ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथे पाणी उपलब्ध होईल. ३५ पैशांत एक लीटरहा पहिला प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आझादनगर, कळवा-मनीषा नगर, अकलेश्वर नगर आदींसह इतर १० ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती डिटो फाऊंडशेनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे बाजारात एक लीटर पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये मोजावे लागतात. परंतु येथे अवघ्या ३५ पैशात एक लीटर पाणी नागरिकांना उपलब्ध झाले आहे. आता हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील इतर ठिकाणी देखील हे प्रयोग राबविले जाणार आहेत.