शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूरमध्ये टॉवेल कारखान्याला भीषण आग; तीन कामगार होरपळले, ५-६ जण अडकले 
2
भारताविरोधात कट रचणाऱ्यासोबत डिनर, पाकिस्तानचा दौरा अन्...; 'अशी' झाली ज्योतीची पोलखोल
3
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
4
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
5
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
6
राज्यामध्ये तब्बल सात हजारावर रुग्ण किडनीच्या प्रतीक्षेत; १,९१९ रुग्णांना यकृत, तर १४१ जणांना गरज आहे हृदयाची
7
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
8
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
9
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
10
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
11
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
12
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
13
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
14
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
15
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
16
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
17
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
18
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
19
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम

सात रूपयांत २० लीटर शुध्द पाणी

By admin | Updated: June 8, 2016 05:03 IST

घोडबंदरच्या प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी तेही अवघ्या सात रुपयात २० लीटर इतक्या प्रमाणात उपलब्ध झाले

ठाणे : घोडबंदरच्या प्रभाग क्रमांक दोनमधील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी तेही अवघ्या सात रुपयात २० लीटर इतक्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. याचा लाभ आजूबाजूच्या सोसायटींसह झोपडपट्टी परिसराला होणार आहे. ठाणे महापालिका, वॉटर लाईफ इंडिया आणि डिटो फाउंडेशनतर्फे या प्रकल्पाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला. ठाणे महापालिकेने दोन वर्षापूर्वी या प्रकल्पाची संकल्पना पुढे आणली होती. त्याला आज प्रत्यक्ष सुरूवात झाली. यावेळी डिटो फाऊंडेशन आणि वॉटर लाईफ इंडियाचे झेंडर वॅन मिरविझिक, शहाना भौमिक, सुदेश मेनन, इंद्रायणी दास, मोहन रानबोअरे, भावना मनोहर डुंबरे आणि स्थानिक नगरसेविका बिंदु मढवी आदी उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नातून आणि महापालिकेने घेतलेल्या पुढाकारामुळे ठाण्यातील १० मधील पहिला प्रकल्प हा विजयनगरी भागात सुरु झाला आहे. बोअरवेलमधील पाणी येथील फिल्टरेशन प्लॅन्टमध्ये टाकले जाते आणि ते शुध्द करुन पाण्याच्या टाकीत सोडले जाते. येथे पाणी घेण्यासाठी येणाऱ्या रहिवाशांना स्मार्ट कार्ड स्वॅप करुन पाणी उपलब्ध करुन दिले जाणार आहे. या प्रक्रियेनंतर दररोज २४ हजार लीटर पाणी या टाकीत उपलब्ध होणार असल्याची माहिती अर्पण फाऊंडेशनच्या अध्यक्षा भावना डुंबरे यांनी दिली. तसेच स. ७ ते दु. १२ आणि सायं. ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथे पाणी उपलब्ध होईल. ३५ पैशांत एक लीटरहा पहिला प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आझादनगर, कळवा-मनीषा नगर, अकलेश्वर नगर आदींसह इतर १० ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती डिटो फाऊंडशेनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे बाजारात एक लीटर पाण्याच्या बाटलीसाठी २० रुपये मोजावे लागतात. परंतु येथे अवघ्या ३५ पैशात एक लीटर पाणी नागरिकांना उपलब्ध झाले आहे. आता हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर शहरातील इतर ठिकाणी देखील हे प्रयोग राबविले जाणार आहेत.