शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

विकास आराखड्यासाठी २ हजार ९६ कोटी

By admin | Updated: June 27, 2017 03:52 IST

मुंबई महापालिकेचा ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेचा ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा सुविधाविषयक बाबी तसेच महापालिका सुविधाविषयक आरक्षणांची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात एकूण २ हजार ९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पातील तरतुदींमधून विकास नियोजन रस्ते, कचरा विभक्तीकरण केंद्र, कचरा प्रक्रिया केंद्र, सार्वजनिक शौचालये, नवीन अग्निशमन केंद्र, उद्याने, खेळाची मैदाने, आरोग्यविषयक सोयीसुविधा, स्मशानभूमी, शालेय इमारती आदी नागरी सेवा-सुविधांचा विकास करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या तरतुदींच्या अनुषंगाने विभाग स्तरावर करावयाच्या कामांची सूची व कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत.महापालिका क्षेत्रासाठीच्या ‘सुधारित विकास आराखडा २०३४’ला अद्याप मंजुरी प्राप्त व्हायची आहे. मात्र असे असले तरी सद्य:स्थितीत दर्शविलेली जी आरक्षणे १९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यात दर्शविलेली आहेत आणि ती जशीच्या तशी २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्यात दर्शविण्यात आली आहेत; त्याचबरोबर सदर आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यातदेखील आली असून मोकळी आहे आणि याशिवाय ज्या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत, अशी आरक्षणे विकसित करण्यासाठी अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.जे मोकळे भूखंड महापालिकेच्या ताब्यात असून त्यावर प्रारूप विकास आराखडा २०३४ मध्ये महापालिका चौकी, रोड डेपो, स्क्रॅप यार्ड यासारख्या महापालिका सुविधांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत; अशा मोकळ्या जागांबाबतदेखील अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.१९६७ च्या मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी १८ टक्के झाली होती, तर १९९१ च्या मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी ३३ टक्के इतकी होती. ही अंमलबजावणी नियोजनाच्या तुलनेत अपेक्षेनुरूप झाली नाही. ही बाब लक्षात घेत आता २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्याची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच वार्षिक नियोजनास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरी सेवा-सुविधांचे अधिक नियोजनबद्ध पर्याय नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील, असा दावा महापालिकेने केला आहे.