शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

विकास आराखड्यासाठी २ हजार ९६ कोटी

By admin | Updated: June 27, 2017 03:52 IST

मुंबई महापालिकेचा ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई महापालिकेचा ‘प्रारूप विकास आराखडा २०३४’ हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा सुविधाविषयक बाबी तसेच महापालिका सुविधाविषयक आरक्षणांची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने कंबर कसली आहे. यासाठी महापालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात एकूण २ हजार ९६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुंबई महापालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पातील तरतुदींमधून विकास नियोजन रस्ते, कचरा विभक्तीकरण केंद्र, कचरा प्रक्रिया केंद्र, सार्वजनिक शौचालये, नवीन अग्निशमन केंद्र, उद्याने, खेळाची मैदाने, आरोग्यविषयक सोयीसुविधा, स्मशानभूमी, शालेय इमारती आदी नागरी सेवा-सुविधांचा विकास करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या तरतुदींच्या अनुषंगाने विभाग स्तरावर करावयाच्या कामांची सूची व कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित परिमंडळीय उपायुक्तांना दिले आहेत.महापालिका क्षेत्रासाठीच्या ‘सुधारित विकास आराखडा २०३४’ला अद्याप मंजुरी प्राप्त व्हायची आहे. मात्र असे असले तरी सद्य:स्थितीत दर्शविलेली जी आरक्षणे १९९१ च्या मंजूर सुधारित विकास आराखड्यात दर्शविलेली आहेत आणि ती जशीच्या तशी २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्यात दर्शविण्यात आली आहेत; त्याचबरोबर सदर आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यातदेखील आली असून मोकळी आहे आणि याशिवाय ज्या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत, अशी आरक्षणे विकसित करण्यासाठी अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.जे मोकळे भूखंड महापालिकेच्या ताब्यात असून त्यावर प्रारूप विकास आराखडा २०३४ मध्ये महापालिका चौकी, रोड डेपो, स्क्रॅप यार्ड यासारख्या महापालिका सुविधांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत; अशा मोकळ्या जागांबाबतदेखील अंमलबजावणी कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे.१९६७ च्या मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी १८ टक्के झाली होती, तर १९९१ च्या मंजूर विकास आराखड्याची अंमलबजावणी ३३ टक्के इतकी होती. ही अंमलबजावणी नियोजनाच्या तुलनेत अपेक्षेनुरूप झाली नाही. ही बाब लक्षात घेत आता २०३४ च्या प्रारूप विकास आराखड्याची अंमलबजावणी अधिक परिणामकारक होण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच वार्षिक नियोजनास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरी सेवा-सुविधांचे अधिक नियोजनबद्ध पर्याय नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील, असा दावा महापालिकेने केला आहे.