शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

२ लाख ६५ हजार विद्यार्थी गायब !

By admin | Updated: January 19, 2016 04:00 IST

मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था/ महाविद्यालयांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ लाख ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी हजेरी पटावरून अचानक कमी झाले आहेत

यदु जोशी,  मुंबईमॅट्रिकोत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था/ महाविद्यालयांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ लाख ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी हजेरी पटावरून अचानक कमी झाले आहेत. हे विद्यार्थी कमी होण्याचा संबंध शिष्यवृत्ती घोटाळ्याशी लावला जात आहे. धक्कादायक म्हणजे, महाविद्यालयांची संख्या ३७३ ने घटली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांना त्यांच्याकडे अनुसूचित जाती, ओबीसी, एसबीसी आणि व्हीजेएनटीचे किती विद्यार्थी आहेत, या बाबत आॅनलाइन नोंदणी करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले होते. १५ जानेवारी २०१६ पर्यंत ही नोंदणी करायची होती. त्यानुसार ११ हजार ७१२ महाविद्यालयांनी नोंदणी केली. त्यांच्याकडे वरील चार प्रवर्गातील १४ लाख १२ हजार ४६४ विद्यार्थी असल्याचे त्यांनी नोंदविले आहे. या आकडेवारीचा उपयोग स्कॉलरशिप देण्यासाठी केला जातो. गेल्या वर्षी (२०१४-१५) १२ हजार ८५ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती आणि त्यांच्याकडे वरील चार प्रवर्गातील १६ लाख ७७ हजार ६१० विद्यार्थी असल्याचे नोंदविले होते. यंदा ही संख्या २ लाख ६५ हजार १४६ ने कमी होऊन १४ लाख १२ हजार ४६४ वर आली आहे. या प्रवर्गातील केवळ एक विद्यार्थी असलेली तब्बल ४७५ महाविद्यालये आहेत. शिष्यवृत्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीची कोट्यवधी रुपयांनी लूट करण्यात येत असल्याचे नव्या सरकारच्या लक्षात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष टास्क फोर्स नेमणार असल्याचे जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचे बोगस प्रवेश दाखविणाऱ्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे विद्यार्थी संख्या २ लाख ६५ हजाराने कमी झाल्याचे स्पष्ट दिसते. याची दुसरी बाजू अशीही आहे की, इतकी मोठी विद्यार्थी संख्या दाखवून शिष्यवृत्तीच्या नावाखाली अनेक संस्थाचालक वर्षानुवर्षे मलिदा खात होते. राज्यातील खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) कॉलेजांनी बोगस प्रवेश व अन्य क्लृप्त्या करून गेल्या ५-६ वर्षांत सरकारी तिजोरीवर ५०० कोटींचा डल्ला मारल्याचे वृत्त ‘लोकमत’ने रविवारच्या अंकात दिले होते. अल्पमुदतीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमधील कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी करणार असलेल्या विशेष टास्क फोर्सकडेच पॉलिटेक्निक शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी दिली जाईल. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही माहिती दिली. अपर पोलीस महासंचालक के.व्यंकटेशम हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत.