शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

वैतरणा नदीतील १९.९० टीएमसी पाणी आता मराठवाड्याकडे वळविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 10:13 IST

पाणी व सिंचनाअभावी परिसरातील स्थानिकांचा विरोध, या अहवालानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (ठाणे) यांनी ३ जुलै रोजी प्रस्ताव सादर केला.

वसंत भोईर वाडा : राज्य सरकारने वैतरणा खोऱ्यातील १९.९० टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठीच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. मात्र, वैतरणा खोऱ्यातील गावे पिण्याचे पाणी व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित असताना हे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या निर्णयाला आता स्थानिकांनी विरोध दर्शवला आहे.

वाडा तालुक्यातून तानसा, वैतरणा, पिंजाळ, देहर्जे व गारगाई अशा पाच नद्या वाहतात. या नद्यांच्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने मार्च-एप्रिल महिन्यातच त्या कोरड्या पडतात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना उन्हाळी पिके घेता येत नाहीत.  यातील वैतरणा व पिंजाळ या नद्यांवर बंधारे बांधण्यात आल्याने बंधारे बांधलेल्या ठिकाणी बारमाही पाणी उपलब्ध होते. उर्वरित ठिकाणी मात्र नदी कोरडी पडते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

पाणी वळवणे शक्य?

जलसंपदा विभागाने काढलेल्या परिपत्रकात, पश्चिम वाहिनी नदीखोऱ्यांतून (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवण्याबाबत प्राथमिक अभ्यास करण्यासाठी एकात्मिक राज्य जल आराखड्यानुसार समिती स्थापन करण्यात आली होती.  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (छत्रपती संभाजीनगर) हे या समितीचे अध्यक्ष होते. या समितीच्या अहवालानुसार पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील उल्हास खोऱ्यातून ३४.८०, तर वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी असे एकूण ५४.७० टीएमसी अतिरिक्त पाणी वळविणे शक्य असल्याचा अहवाल त्यांनी दिला आहे.

अंदाजपत्रकासही मंजुरी

या अहवालानुसार कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक (ठाणे) यांनी ३ जुलै रोजी प्रस्ताव सादर केला. त्याअनुषंगाने या योजनेचे सर्वेक्षण, अन्वेषण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या कामाच्या ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जलसंपदा विभागाच्या प्रधान उपसचिव जया पोतदार यांच्या सहीने काढण्यात आला असून या निर्णयामुळे वैतरणा खोऱ्यातील गावांत मात्र खळबळ माजली आहे.