शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

१८० कोेटी लीटर पाण्याची बचत

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याची बचत करण्यात महाराष्ट्रात आघाडी मिळविली असून, पाण्याचा पुनर्वापर करून २००३ ते २०१६ या कालावधीत १८० कोटी लीटर पाण्याची म्हणजे जवळपास

- दयानंद पाईकराव,  नागपूरमध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याची बचत करण्यात महाराष्ट्रात आघाडी मिळविली असून, पाण्याचा पुनर्वापर करून २००३ ते २०१६ या कालावधीत १८० कोटी लीटर पाण्याची म्हणजे जवळपास ३.५० कोटी रुपयांची बचत केली आहे. रेल्वेच्या इतर विभागात, तसेच एसटी महामंडळ आणि खासगी उद्योगात असाच पाण्याचा पुनर्वापर केल्यास महाराष्ट्रातील जलसंकट दूर होण्यास मदत होऊ शकेल.रेल्वे विभागात गाड्या-प्लॅटफॉर्म धुणे, रेल्वे रुळाची स्वच्छता यासाठी दररोज हजारो लीटर पाण्याची नासाडी होते, परंतु मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पाण्याचे महत्त्व ओळखून नागपूर विभागात नाल्यातून वाहणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा २००३ मध्ये पुनर्वापर सुरू केला. त्यासाठी २८.४८ लाखांचा प्रकल्प नागपुरात उभारला. त्यात दररोज ६ लाख लीटर पाण्याचे शुद्धिकरण करण्याची क्षमता आहे. सध्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात ४ लाख लीटर पाण्याचे म्हणजे महिन्याकाठी १.२० कोटी लीटर पाण्याचे शुद्धिकरण होते.२००३ - २०१६ या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने जवळपास १८० कोटी लीटरच्या पाण्याचे शुद्धिकरण करून त्याचा पुनर्वापर केला. रेल्वेने एवढे पाणी महापालिकेकडून विकत घेतले असते, तर त्यांना तब्बल ३.५० कोटी रुपये मोजावे लागले असते.सध्या महाराष्ट्रात पाण्याची भीषण टंचाई पाहता, अशा प्रकारे पाण्याचा पुनर्वापर केल्याने एक प्रकारे पाण्याची बचतच होत आहे. आम्ही आणखी अशाच प्रकारचे जलशुद्धिकरण केंद्र बल्लारशा येथे सुरू करणार आहोत. या प्रकल्पाची क्षमता सहा लाख लीटर प्रतिदिन राहणार आहे. या शिवाय नागपुरातील प्रकल्पाची क्षमता एक लाख लीटरने वाढविण्याचा विचार सुरू आहे.- प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे नागपूर विभाग