शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

ग्रामीण भागात १८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 12, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असून त्यांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याच्या टंचाईचा हा अहवाल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत प्रशासनातर्फे मांडण्यात आला.नियोजन भवनमध्ये पार पडलेल्या या बैठकीला आमदार, खासदारांसह ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद बोरसे आदींसह महापालिकांचे प्रतिनिधी, विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. महापालिकांसह ग्रामीण व दुर्गम भागातील टंचाईसंदर्भात या वेळी आढावा घेण्यात आला. पाणीसमस्या तत्काळ दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. धरणांच्या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आगामी बैठकीमध्ये टंचाई कमी झाल्याचा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्र्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना सांगितले.धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आधीच कपात सुरू करण्यात आली आहे. पण, या कपातीच्या नावाखाली बहुतांशी ठिकाणी २४ तासांच्या पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. यासाठी महापालिकांसह पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी, जलसंपदा विभागप्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश या वेळी त्यांनी दिले.बैठकीत उल्हासनगरातील २४ तासांची पाणीकपात १२ तासांवर आणण्याकरिता चर्चा झाली. भिवंडी शहरातील पाणीगळती, होणारा टँकरचा पाणीपुरवठा विकासकांसह डाइंग प्रोसेसिंग कारखान्यांना होत असल्याच्या मुद्यावरही या वेळी चर्चा झाली. मीरा-भार्इंदर महापालिकेला वाढीव पाणीपुरवठा केल्याशिवाय पाणीसमस्या दूर होणार नाही. अंबरनाथ, बदलापूर शहरांसाठी सहा महिन्यांत वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. तसेच २४ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याचे काम पूर्णत्वाकडे असून पाच एमएलडीचे काम आधीच पूर्ण करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)