शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

ग्रामीण भागात १८ टँकरने पाणीपुरवठा

By admin | Updated: May 12, 2015 01:57 IST

जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड

ठाणे : जिल्ह्यातील महापालिका क्षेत्रामध्ये होत असलेल्या पाणीकपातीमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर ग्रामीण भागातही सुमारे १०४ गावपाडे तीव्र पाणीटंचाईला तोंड देत असून त्यांना १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याच्या टंचाईचा हा अहवाल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पाणीटंचाई आढावा बैठकीत प्रशासनातर्फे मांडण्यात आला.नियोजन भवनमध्ये पार पडलेल्या या बैठकीला आमदार, खासदारांसह ठाणे जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी, अतिरिक्त सीईओ रवींद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी प्रमोद बोरसे आदींसह महापालिकांचे प्रतिनिधी, विभागप्रमुख या वेळी उपस्थित होते. महापालिकांसह ग्रामीण व दुर्गम भागातील टंचाईसंदर्भात या वेळी आढावा घेण्यात आला. पाणीसमस्या तत्काळ दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी जोरदार प्रयत्न करण्याची गरज आहे. धरणांच्या जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून आगामी बैठकीमध्ये टंचाई कमी झाल्याचा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे पालकमंत्र्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना सांगितले.धरणातील पाणीसाठा टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आधीच कपात सुरू करण्यात आली आहे. पण, या कपातीच्या नावाखाली बहुतांशी ठिकाणी २४ तासांच्या पाणीकपातीच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मंत्रालयात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. यासाठी महापालिकांसह पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडीसी, जलसंपदा विभागप्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश या वेळी त्यांनी दिले.बैठकीत उल्हासनगरातील २४ तासांची पाणीकपात १२ तासांवर आणण्याकरिता चर्चा झाली. भिवंडी शहरातील पाणीगळती, होणारा टँकरचा पाणीपुरवठा विकासकांसह डाइंग प्रोसेसिंग कारखान्यांना होत असल्याच्या मुद्यावरही या वेळी चर्चा झाली. मीरा-भार्इंदर महापालिकेला वाढीव पाणीपुरवठा केल्याशिवाय पाणीसमस्या दूर होणार नाही. अंबरनाथ, बदलापूर शहरांसाठी सहा महिन्यांत वाढीव पाणीपुरवठा होणार आहे. तसेच २४ एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याचे काम पूर्णत्वाकडे असून पाच एमएलडीचे काम आधीच पूर्ण करण्यात आल्याची माहिती या वेळी देण्यात आली. (प्रतिनिधी)