शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहांचे १,८०० कोटी शासनाकडे पडून

By admin | Updated: January 29, 2015 05:46 IST

आघाडी सरकारच्या अखरेच्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागातील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सुमारे तीन हजार कोटींवर तरतूद केली होती़

स्रेहा मोरे, मुंबईआघाडी सरकारच्या अखरेच्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागातील विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सुमारे तीन हजार कोटींवर तरतूद केली होती़ त्या तरतुदीतून जानेवारी २०१५ अखेर तब्बल १,८०८ कोटी विभागाकडे खर्च करण्यासाठी शिल्लक असताना अनाथ बालकांच्या परिपोषण अनुदानासाठी महिला-बालकल्याण विभाग आखडता हात घेत असल्याचे उघड झाले आहे. आता नव्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून ठोस निर्णयाची बालगृहांना आशा आहे. २०१४-१५च्या अर्थसंकल्पात महिला व बालकल्याण विभागासाठी ३,३७८. ३८९ कोटींची तरतूद केलेली असताना या विभागाने जानेवारी २०१५ अखेर केवळ १,५६९.६१० कोटी म्हणजे अवघे ४६.४६० टक्केच खर्च केल्याने आजमितीस विभागाकडे तब्बल १,८०८.७७९ कोटी अर्थात ५३.५४ टक्के निधी पडून आहे. राज्यातील सुमारे हजारांवर बालगृहांचे दोन वर्षांपासूनचे १०८ कोटी आणि चालू वर्षाचे अंदाजे ७० ते ८० कोटी रुपये अनुदान प्रलंबित आहे. अशा एकूण १७८ ते १८८ कोटी रुपयांची व्यवस्था विभागाच्या एकूण तरतुदीतून शिल्लक असलेल्या पैशांतून करता येणे सहज शक्य आहे. मात्र विभागाची अनास्थाच अनाथ बालकांच्या आणि पर्यायाने त्यांना सांभाळणाऱ्या या स्वयंसेवी संस्थांच्या मुळावर उठली आहे. शासनाने २००६ मध्ये शासन निर्णय पारित केला़ त्यात १०० मुलांच्या एका बालगृहासाठी ११ कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर केला़ मात्र या शासन निर्णयात या ११ कर्मचाऱ्यांना वेतनाची तरतूद दर्शवली नाही. उलटपक्षी मुलांच्या परिपोषण अनुदानातूनच कर्मचारी मानधन व्यवस्था करावी, असा उल्लेख आहे.अर्थसंकल्पात बालगृहांसाठी पूर्ण तरतूद असावी, वाढीव अनुदानाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी औरंगाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली आहे, असे लातूरचे बालगृहचालक आणि याचिकाकर्ते शिवाजी जोशी यांनी सांगितले.