शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातांत १८ ठार

By admin | Updated: May 26, 2015 02:30 IST

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथे सोमवारी पहाटे दोन बसच्या अपघातात ११ जण ठार तर इतर १० जण गंभीर जखमी झाले.

तलासरी (जि. पालघर) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी येथे सोमवारी पहाटे दोन बसच्या अपघातात ११ जण ठार तर इतर १० जण गंभीर जखमी झाले. सुरत येथील पटेल कुटुंबीय गुजरातला परतत असताना टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडला.पटेल कुटुंबीय आपल्या नातेवाइकांना मुंबई एअरपोर्टवर सोडण्यासाठी आले होते. गुजरात येथे परत जात असताना महाराष्ट्राच्या हद्दीवरील आच्छाड येथे चालकाला डुलकी लागली. त्यामुळे त्याचा ताबा सुटून बस महामार्गावरील डिव्हायडर तोडून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या लक्झरीवर आदळली. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हरलमधील १० तर लक्झरीमधील १ असे ११ जण जागीच ठार झाले. जखमींना वापी व सिल्व्हासा तसेच तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातातील मृतांची नावे :तुषार भरत पटेल (३२), अम्मी तुषार पटेल (३०), ध्येय तुषार पटेल (११), धवलभाई प्रवीणभाई पटेल (२८), भूमिका धवलभाई पटेल (२५), मनोहरभाई जेवेरभाई पटेल (४६), भूमी मणीशभाई महन्त (१८), डॅनिश प्रवीणभाई पटेल (३०), रिना डॅनिश पटेल (२७), जिया धवलभाई पटेल (५) आणि तुस्मानभाई व्होरा.बारामती (जि. पुणे) : बालाजीच्या दर्शनाला निघालेल्या स्कार्पिओचा कर्नूर ते चित्तुर (आंध्र प्रदेश)दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. यात बारामतीच्या ७ युवकांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी पहाटे चालकाला डुलकी लागल्याने घडला.च्बारामतीहून सात युवक स्कार्पिओ गाडीतून रविवारी तिरुपतीला देवदर्शनासाठी निघाले होते. सोमवारी पहाटे अडीचच्या सुमारास आंध्र प्रदेशातील कर्नूर-चित्तुर महामार्गावर चांगलामारीनजीक चालकाला झोप लागल्याने गाडी रस्त्यालगतच्या घरावर जाऊन आदळली. त्यात पाच जण ठार झाले तर अन्य दोघे जखमी झाले.मृतांची नावे -शेखर बापूराव गवळी (२२), हृषीकेश पोपट गवळी (१७), अनिल सत्यवान गवळी (२५), सागर बाळासाहेब रसाळ (२०), सागर अंकुश रसाळ (२५), अजित रामचंद्र रसाळ (३१), नागेश बाळासाहेब खराडे (२१).