शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

पोलीस, न्यायाधीशांमुळे १८ दिवस कोठडी

By admin | Updated: January 22, 2016 03:40 IST

लग्न करण्याचे वचन देऊन बलात्कार केल्याबद्दल औरंगाबाद येथील एका मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीत पुण्याच्या भोसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व तेथील न्याय दंडाधिकारी

मुंबई : लग्न करण्याचे वचन देऊन बलात्कार केल्याबद्दल औरंगाबाद येथील एका मुलीने दाखल केलेल्या फिर्यादीत पुण्याच्या भोसरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व तेथील न्याय दंडाधिकारी आणि सत्र न्यायाधीशांच्या हलगर्जीपणाने व चुकांमुळे आरोपीच्या विवाहित बहिणीस व मेव्हण्यास १८ दिवस नाहक कोठडीत राहावे लागल्याबद्दल राज्य सरकारने या बाधित दाम्पत्यास ५० हजार रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश उच्च न्यायालयाने गुरुवारी दिला.पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी कसूर करणाऱ्या भोसरी ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि भरपाईपोटी द्यावी लागलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी, असाही आदेश न्या. रणजीत मोरे व न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने दिला.एवढेच नव्हे, तर ज्यांनी कायद्याची बूज न राखल्याने या दाम्पत्यास बेकायदेशीरपणे कोठडीत राहावे लागले त्या दंडाधिकारी व सत्र न्यायाधीशांविरुद्ध चौकशी करण्याचाही आदेशही दिला गेला. पोलीस आयुक्तांनी केलेल्या चौकशी व कारवाईचा अहवाल चार महिन्यांत उच्च न्यायालयास सादर करायचा आहे.पुण्यात हिंजेवाडी येथे राहणारा भारत साळवी, त्याची आई आणि इतर नातेवाइकांनी त्यांच्याविरुद्ध भोसरी पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका केली होती. ती अंशत: मंजूर करताना खंडपीठाने हा निकाल दिला. त्यानुसार व्यवसायाने डॉक्टर असलेली भारतची विवाहित बहीण मेरी व तिचे डॉक्टर पती अजय यांना सरकारने भरपाई द्यायची आहे. खंडपीठाने भारतविरुद्धचा बलात्काराचा गुन्हा कायम ठेवला. मात्र इतर नातेवाइकांवर नोंदलेले सर्व गुन्हे रद्द केले.या सुनावणीत अर्जदार साळवी व त्याच्या नातेवाइकांसाठी अ‍ॅड. क्षितिजा सारंगी, सरकारतर्फे प्रॉसिक्युटर संदीप शिंदे तर तक्रारदार महिलेसाठी अ‍ॅड. सत्यव्रत जोशी यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)न्यायनगर, गारखेडा, औरंगाबाद येथे राहणाऱ्या ल्युसिया पेतारस जाधव या तरुणीचा सरिता संगम अपार्टमेंट््स, कासारवाडी, पुणे येथील भारत वेवधन साळवी याच्याशी विवाह ठरला होता. दोन्हीकडच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत ल्युसिया व अजय यांचा १२ डिसेंबर २०१४ रोजी साखरपुडाही झाला होता. दोघेही परस्परांचे दूरचे नातेवाईकही आहेत. साखरपुड्याच्या आधी चार दिवस ९ डिसेंबर रोजी भावी सासरच्या घरी गेले असता उशीर झाल्याची सबब सांगून आपल्याला तेथेच राहायला सांगितले गेले.