शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

सीईटीपीतील सक्षम यंत्रणेसाठी १८ कोटी

By admin | Updated: June 13, 2016 04:34 IST

लोटे एमआयडीसी येथील कंपन्याचे सांडपाणी वाहत जाऊन ते खाडी आणि नद्यांच्या पाण्यात मिसळत असल्याने तेथील पाणी प्रदूषित होत आहे.

श्रीकांत चाळके,

खेड- खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी येथील कंपन्याचे सांडपाणी वाहत जाऊन ते खाडी आणि नद्यांच्या पाण्यात मिसळत असल्याने तेथील पाणी प्रदूषित होत आहे. अशा पाणीप्रदूषित परिसरातील गावांमध्ये काही लोकांना कॅन्सर झाला असल्याचे पुढे येत आहे. गेली अनेक वर्ष हा प्रश्न अधांतरी राहिला असून, याबाबत आपण सीईटीपी तसेच टाटा कॅन्सर रिसर्च आणि डेरवण रूग्णालयाच्या कॅन्सर विभागप्रमुखांशी चर्चा करून संबंधितांची तपासणी करण्यासाठी सहकार्य करू, असे भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी सांगितले. लोटे येथील सीईटीपीची सध्याची क्षमता कमी असल्याने ती वाढवून सक्षम यंत्रणा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. त्याकरिता १८ कोटी रूपये खर्चाला अनुमती मिळणार असल्याची माहिती माने यांनी दिली आहे.खेड येथील अनिकेत शॉपींग सेंटरमध्ये आयोेजित पत्रकार परिषदेत बाळ माने बोलत होते. खेड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्यावतीने खेड शहरासाठी करण्यात येत असलेल्या विकासकामांबाबत बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी खेडचे माजी नगराध्यक्ष आणि खेड भाजपचे पदाधिकारी आबा जोशी, अ‍ॅड. मिलिंद जाडकर, खेडचे माजी तालुकाध्यक्ष संजय बुटाला, रमेश भागवत, तालुकाध्यक्ष नाना चाळके, अ‍ॅड. संदेश चिकणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. खेड शहरासाठी नगरोत्थान योजनेंतर्गत १३ कोटी रूपये खर्चाची सुजल पाणीपुरवठा योजना आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण ही दोन कामे भाजपच्या अजेंड्यावर असून, यासाठी खेडचे माजी नगराध्यक्ष आबा जोशी यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखविल्याची माहिती दिली. >कॅन्सरची लागण : मुख्यमंत्र्यांशी बोलणारगेली अनेक वर्ष हा प्रश्न अधांतरीत राहिला आहे.सीईटीपी, टाटा कॅन्सर रिसर्च, डेरवण रूग्णालयाच्या विभागप्रमुखांशी चर्चा करणार.लोटे एमआयडीसीतील प्रदूषित पाण्यामुळे खाडीपट्ट्यातील नागरिकांना कॅन्सरची लागण होत असून, त्याकडे हेतूपूरस्सर दुर्लक्ष होत असल्याचे सांगताच ही बाब गंभीर असल्याचे बाळ माने म्हणाले. याबाबत मुख्यमंत्री तसेच अन्य संबंधितांशी बोलून करून निर्णय घेऊ तसेच संबंधित रूग्णांची तपासणी करून अशा प्रकारच्या आजाराबाबत खात्री करण्यासाठी यंत्रणेशी बोलू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.गाळाकडे लक्ष देणारजगबुडी नदीतील गाळ काढणेचे काम गेले३ वर्षे सुरू आहे़ लवकरच याबाबत संबंधितांशी चर्चा करून खरी परिस्थिती समोर आणू, असे त्यांनी सांगितले़