शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

१८९ बलात्कार पीडिता मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 30, 2016 01:44 IST

राज्यातील बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पिडीतांना १५ दिवसांत आर्थिक मदत देण्याची तरतूद सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेत असतानाही मुंबई उपनगरांतील १८९ बलात्कार पिडीता घटना

मुंबई : राज्यातील बलात्कार व अ‍ॅसिड हल्ला पिडीतांना १५ दिवसांत आर्थिक मदत देण्याची तरतूद सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेत असतानाही मुंबई उपनगरांतील १८९ बलात्कार पिडीता घटना घडून १५ दिवस उलटूनही सकारच्या आर्थिक मदतीपासून वंचित आहेत. ही आर्थिक मदत मंजूर करणाऱ्या सरकारच्या कारभाराचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. ‘फोरम अगेन्स्ट अप्रेशन आॅफ वुमेन’ या एनजीओने राज्य सरकार बलात्कार व अन्य अत्याचाराला बळी पडीलेल्या महिलांना ‘मनोधैर्य’ अंतर्गत नुकसान भरपाई देण्यास विलंब करत असल्याने सरकारला पिडीतांना ही नुकसान भरपाई वेळेत देण्याचे निर्देश द्यावे, यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने मुंबई उपनगरांत किती बलात्काराच्या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी किती पिडीतांना आर्थिक मदत देण्यात आली आहे, अशी विचारणा राज्य सरकारकडे केली होती.उच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत राज्य सरकारने मुंबई उपनगरांतील माहिती खंडपीठासमोर सादर केली. मुंबई उपनगरांत एकुण बलात्काराच्या व महिला अत्याचाराच्या एकूण १९२ केसेस नोंदवण्यात आल्या असून समितीने १८९ केसेसमधील महिलांना आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. मात्र यापैकी बऱ्याच पिडीतांची बँक खाती नाहीत तर काहींचा पत्ता योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत मदत पोहचत नाही, असे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले.सरकारच्या मनोधैर्य योजनेप्रमाणे १५ दिवसांत पिडीतेला आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. मात्र येथे तर सगळ्याच केसेसमधील पिडीतांना १५ दिवसांच्या आत मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारची योजना निष्फळ ठरली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने महिलांना आर्थिक मदत द्यायची की नाही, यावर निर्णय घेणाऱ्या समितीचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश सरकारला दिले. (प्रतिनिधी)