शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चौदा वर्षांत १७६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By admin | Updated: January 16, 2015 00:16 IST

सांगली जिल्ह्यातील स्थिती : किचकट नियमांमुळे ७१ शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाच सरकारी मदत

अंजर अथणीकर -सांगली -विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येइतकेच विदारक चित्र सांगली जिल्ह्यातही असल्याची बाब शासकीय आकडेवारीवरुन स्पष्ट झाली आहे. गेल्या चौदा वर्षांत सांगली जिल्ह्यातील तब्बल १७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपविली आहे. धक्कादायक बाब म्हणजे किचकट नियमांना तोंड देत यातील केवळ ७१ शेतकऱ्यांच्या कुटुंबांनाच शासकीय मदत मिळाली. द्राक्ष आणि डाळिंबाने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना लखपती होण्याचे स्वप्न दाखविले आणि मुळात या बागाच शेतकऱ्यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये काल, बुधवारी एकाचदिवशी कवठेमहांकाळ तालुक्यातील बनेवाडी येथील प्रकाश जाधव (वय ४०) व आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथील डाळिंब बागायतदार विलास गायकवाड (४२) यांनी आत्महत्या केली. प्राथमिक तपासात, त्यांनी कर्जास कंटाळून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. नेहमी जत, आटपाडी व कवठेमहांकाळ या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या. आता मात्र हे लोण तासगाव, वाळवा व पलूस या सधन तालुक्यांतही पसरले आहे. गेल्या चौदा वर्षांत १७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याची शासकीय दरबारी नोंदही आहे. प्रशासनाकडून मदतीसाठी या प्रकरणांची चौकशी करण्यात आली. त्यामधील केवळ ७१ शेतकऱ्यांची कुटुंबेच शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. तीन शेतकऱ्यांची आत्महत्या अद्याप चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा मार्ग अवलंबणाऱ्या शेतकऱ्यांच्या वारसांंना मदत देण्यासाठी शासनाने निकष तयार केले असून, यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्या मदतीसाठीच्या निकषात अपात्र ठरत आहेत. कर्जबाजारी असूनही या शेतकऱ्यांचे वारस मदतीपासून वंचित राहात आहेत. ज्यांच्या शेतीवर अधिकृत बँका, संस्थांचे कर्ज असेल, त्याच शेतकऱ्यांना मदत मिळते. इतर कारणासाठी कर्ज असेल किंवा सावकारांकडील कर्ज, उसनवारी केली असेल तर त्या शेतकऱ्यांना मात्र कोणतीही मदत मिळत नाही.बहुतांशी शेतकरी झटपट कर्जासाठी सावकार व मित्रपरिवाराकडून कर्जे घेतात. अशा शेतकऱ्यांचे व्याज वेगाने वाढते. त्यामुळे नैराश्येतून ते आत्महत्येस प्रवृत्त होतात. सावकारांच्या तगाद्यानेच अधिक आत्महत्या होत आहेत. राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी बँकांचा इतका त्रास नसतो, मात्र असे असताना सावकारांकडून कर्ज घेतलेले शेतकरी मात्र शासकीय लाभापासून वंचित राहात आहेत.सर्व प्रकारच्या संकटांना तोंडगेल्या चौदा वर्षाच्या कालावधित कोरडा दुष्काळ, ओला दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण अशा नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले. नैराश्येतून शेकडोंनी आत्महत्या झाल्या तर अनेकांनी श्रीमंतीतून गरिबीकडे वाटचाल केली. यात भरीस भर म्हणून शासकीय धोरणांचाही फटका निसर्गाइतकाच शेतकऱ्यांना आणि त्यांच्या शेतीला बसला. आत्महत्याग्रस्तांसाठी लाखाची मदतशेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर पंचनामा करुन प्रशासनाकडून त्याची चौकशी केली जाते. शेतीवर अधिकृत संस्थांचे कर्ज असेल, तरच संबंधित वारसांना एक लाखाची मदत दिली जाते. गेल्या दोन वर्षांत सांगली जिल्ह्यातील अठरा शेतकऱ्यांना अशा प्रकारची मदत मिळाली आहे. प्रत्यक्षात तीसहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांंना मदत देण्याचे निकषच मुळात चुकीचे आहेत. शेतकऱ्यांच्या नावावर सात-बारा असेल तरच मदत मिळते. अनेकदा ही जमीन नातेवाइकांच्या नावावर असते, कर्जे सावकारांची असतात. सांगली जिल्ह्याबाबत बोलायचे झाल्यास, हा जिल्हा राजकीयदृष्ट्या आघाडीवर असल्यामुळे येथील राजकारणी कर्जास कंटाळून आत्महत्या हा प्रकारच दाबून टाकतात. आपली बदनामी झाकण्यासाठी राजकारणी कर्जास कंटाळून आत्महत्या कागदोपत्री दाखवत नाहीत. यासाठी दबावाचा अवलंब करतात. याचा अनुभव आपल्या संघटनेने घेतला आहे.- रघुनाथ पाटील, नेते, शेतकरी संघटना