शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

न्यायाधीशांच्या दिमतीला आणखी १७४ कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:03 IST

शासनाच्या काटकसरीच्या धोरणामुळे बहुतांश सरकारी व निमसरकारी विभागाकडून आवश्यक पदांची सरळ भरती न करता बाह्य यंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग) करण्याकडे कल

- जमीर काझीं । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शासनाच्या काटकसरीच्या धोरणामुळे बहुतांश सरकारी व निमसरकारी विभागाकडून आवश्यक पदांची सरळ भरती न करता बाह्य यंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग) करण्याकडे कल असला तरी उच्च न्यायालयातील भरतीत मात्र त्याला अपवाद करण्यात आला आहे. उच्च न्यायालयात शिपायांची १७४ पदे पूर्णवेळ व कायमस्वरूपी भरण्यात येणार आहेत. न्यायालयाच्या कामकाजाची गोपनीयता व विश्वासार्हता कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार हायकोर्टातील ८७ न्यायमूर्तींसाठी शिपायाची प्रत्येकी दोन पदे कायमस्वरूपी निर्माण केली जाणार आहेत.विविध विभागांतील कित्येक वर्षांपासूनचा रिक्त पदांचा अनुशेष भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नोकर भरतीबाबत दिलेला आदेश आणि काटकसरीमुळे गेल्या काही वर्षांपासून सरकारी विभागात थेट भरतीपेक्षा ठरावीक दरामध्ये ‘आऊटसोर्सिंग’ केले जात आहे.उच्च न्यायालयात अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले खटले मार्गी लावण्यासाठी न्यायाधीशांबरोबरच त्यांच्या स्टाफमध्येही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयातील प्रत्येक न्यायमूर्तीकडील मंजूर पदांची संख्या ९ वरून १३ इतकी करण्यात आली. त्याबाबतचा प्रस्ताव उच्च न्यायालयातील प्रबंधकांकडून दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे सादर करण्यात आला होता. गेल्या वर्षी मे महिन्यात शासनाने त्याला हिरवा कंदील दाखविला. त्यामध्ये प्रत्येक न्यायाधीशासाठी शिपायाच्या प्रत्येकी दोन पदांचा समावेश होता. - मुंबई उच्च न्यायालयात ८७ न्यायाधीशांची पदे असून प्रत्येकाला ९ ऐवजी १३ जणांचे मनुष्यबळ पुरविण्यात येणार आहे. वाढीव चार पदांमध्ये स्वीय साहाय्यक व लिपिकांचे प्रत्येकी एक तर शिपायांची दोन पदे भरली जाणार आहेत.