शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

पालघर जिल्ह्यात शिष्यवृती परीक्षेला १७ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 03:21 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. या वेळी संपूर्ण जिल्ह्यातून पाचवीचे १०,५६८ तर आठवीचे ७,३०१ परीक्षार्थी होते.

पालघर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. या वेळी संपूर्ण जिल्ह्यातून पाचवीचे १०,५६८ तर आठवीचे ७,३०१ परीक्षार्थी होते. दोन सत्रात तसेच बहुसंच पद्धतीचा अवलंब आणि चौथी एैवजी पाचवी आणि सातवी एैवजी आठवी इयत्तेसाठी प्रथमच परीक्षा हे यंदाच्या परीक्षेचे वैशिष्ट्य ठरले. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांमध्ये १४८ केंद्रे होती. त्या पैकी इयत्ता पाचवीसाठी ८६ तर आठवीकरीता ६२ केंद्रे होती. तेवढ्याच केंद्र संचालकांची नियुक्ती केली होती. परीक्षेसाठी पाचवीच्या १०,५६८ तर आठवीच्या ७, ३०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी अनुक्र मे १०,११६ आणि ७,००३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. माध्यमनिहाय एका वर्गात २४ विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी एकूण ७२५ पर्यवेक्षकांनी काम पाहिले. या परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या परिक्षार्थ्यांना ए, बी, सी, डी या पद्धतीने प्रश्नपत्रिका संच देण्यात आले होते. पाचवी करिता उत्तराच्या चार पैकी एक पर्याय योग्य होता, तर आठवीला प्रत्येक पेपरात कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत चारपैकी दोन उत्तरांचे पर्याय योग्य असून दोन्हीही नोंदवणे बंधनकारक होते. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या व न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेवर परीक्षेचा वेळ संपल्यावर तत्काळ नोंदविण्यात आली. या पूर्वी तीन सत्रात होणारी परीक्षा या वेळी ११ ते १२:३० आणि १:३० ते ३ या दोन सत्रात घेतली गेली. जिल्हास्तरावर स्कॉलरशिप संबंधी माहिती दिल्यानंतर त्याचे तालुकास्तरावर ट्रेनिग देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून रंगीततालीम करून घेतली होती. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा पार पाडण्यात यश आले.प्रवेशपत्र आॅनलाइनपरीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून त्याची प्रिंट काढण्याची सुविधा असल्याने गहाळ किंवा विसरले गेल्यास संबंधित शाळेशी संपर्क साधण्यात विद्यार्थी व पालकांची होणारी तारांबळ आदि प्रकारांना आळा घालता आला.