शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात शिष्यवृती परीक्षेला १७ हजार विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2017 03:21 IST

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. या वेळी संपूर्ण जिल्ह्यातून पाचवीचे १०,५६८ तर आठवीचे ७,३०१ परीक्षार्थी होते.

पालघर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात आली. या वेळी संपूर्ण जिल्ह्यातून पाचवीचे १०,५६८ तर आठवीचे ७,३०१ परीक्षार्थी होते. दोन सत्रात तसेच बहुसंच पद्धतीचा अवलंब आणि चौथी एैवजी पाचवी आणि सातवी एैवजी आठवी इयत्तेसाठी प्रथमच परीक्षा हे यंदाच्या परीक्षेचे वैशिष्ट्य ठरले. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेसाठी पालघर जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यांमध्ये १४८ केंद्रे होती. त्या पैकी इयत्ता पाचवीसाठी ८६ तर आठवीकरीता ६२ केंद्रे होती. तेवढ्याच केंद्र संचालकांची नियुक्ती केली होती. परीक्षेसाठी पाचवीच्या १०,५६८ तर आठवीच्या ७, ३०१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी अनुक्र मे १०,११६ आणि ७,००३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. माध्यमनिहाय एका वर्गात २४ विद्यार्थ्यांसाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. या वेळी एकूण ७२५ पर्यवेक्षकांनी काम पाहिले. या परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या परिक्षार्थ्यांना ए, बी, सी, डी या पद्धतीने प्रश्नपत्रिका संच देण्यात आले होते. पाचवी करिता उत्तराच्या चार पैकी एक पर्याय योग्य होता, तर आठवीला प्रत्येक पेपरात कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत चारपैकी दोन उत्तरांचे पर्याय योग्य असून दोन्हीही नोंदवणे बंधनकारक होते. विद्यार्थ्यांनी सोडविलेल्या व न सोडविलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेवर परीक्षेचा वेळ संपल्यावर तत्काळ नोंदविण्यात आली. या पूर्वी तीन सत्रात होणारी परीक्षा या वेळी ११ ते १२:३० आणि १:३० ते ३ या दोन सत्रात घेतली गेली. जिल्हास्तरावर स्कॉलरशिप संबंधी माहिती दिल्यानंतर त्याचे तालुकास्तरावर ट्रेनिग देण्यात आली होती. त्यानंतर संबंधित शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून रंगीततालीम करून घेतली होती. जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्या नेतृत्वाखाली परीक्षा पार पाडण्यात यश आले.प्रवेशपत्र आॅनलाइनपरीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून त्याची प्रिंट काढण्याची सुविधा असल्याने गहाळ किंवा विसरले गेल्यास संबंधित शाळेशी संपर्क साधण्यात विद्यार्थी व पालकांची होणारी तारांबळ आदि प्रकारांना आळा घालता आला.