शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
4
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
5
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
6
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
7
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
8
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
9
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
10
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
11
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
12
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
13
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
14
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
15
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
16
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
17
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
18
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
19
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात १७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 02:44 IST

उपनगरीय रेल्वे हद्दीत मंगळवारी घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये १७ प्रवाशांचे बळी गेले.

मुंबई : उपनगरीय रेल्वे हद्दीत मंगळवारी घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये १७ प्रवाशांचे बळी गेले. यात रूळ ओलांडतानाच १0 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे. तर तीन प्रवाशांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. कुर्ला, कल्याण, मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात जास्त अपघातांची नोंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. रेल्वे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. यात दोन रुळांच्या मध्ये तारांचे कुंपण, रुळांजवळ असणाऱ्या झोपड्यांजवळ भिंतींचे कुंपण बांधण्यात येत आहे. महामंडळाने तर १२ स्थानकांच्या परिसरांत प्रवासी सुरक्षेसाठी १२0 कोटींची तरतूद केली आहे. मात्र या योजना करूनही रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मंगळवारी तीन अपघात ट्रेनमधून पडून झाले. एकाचा डहाणू प्लॅटफॉर्मवर लोकलची ठोकर लागून मृत्यू झाला. तर अन्य तीन जणांचे मृत्यू हे नैसर्गिक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) >सर्व स्थानकांजवळ बॅरिकेड्स टाकाजास्तीत जास्त अपघात रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना होत असल्याने अपघात रोखण्यासाठी सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांजवळ बॅरिकेड्स टाका, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वेला केली. ‘मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकना बॅरिकेड्स टाका. कारण जास्तीत जास्त मृत्यू रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना होतात,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले.हँकॉक पूल जुना झाल्याने रेल्वे प्रशासन व महापालिकेने हा पूल पाडला. मात्र पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने वरील सूचना रेल्वेला केली.हँकॉक पूल पाडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे रेल्वेनेही उच्च न्यायालयात मान्य केले. त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड्स टाकण्यात येतील, असे रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. रेल्वे पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार, गेल्या महिन्यात १५० लोकांचा मृत्यू ट्रॅक ओलांडताना झाला. तर २० सप्टेंबर रोजी १७ लोकांचा मृत्यू झाला. त्यातील आठ पश्चिम रेल्वे व नऊ जणांचा मृत्यू मध्य रेल्वेच्या हद्दीत झाला. >रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांकडून आढावामुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची सूचना रेल्वे बोर्डाकडून पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे. बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने बुधवारी मुंबईत रेल्वे स्थानकांना भेट देत प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती घेतली. त्या वेळी रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर न्यायालयीन प्रक्रियेऐवजी जागीच रेल्वे नियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यावर भर देण्याचे सुचविले. त्यादृष्टीने पाऊल उचलण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून या वेळी सांगण्यात आले.मुंबई भेटीवर आलेल्या समितीत रेल्वे बोर्डाचे सल्लागार ए.एस. उपाध्याय, जेपीएस सिंह आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीकडून अंधेरी-जोगेश्वरी दरम्यानच्या फाटकाचीही पाहणी करण्यात आली.