शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

दिवसभरात १७ प्रवाशांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 02:44 IST

उपनगरीय रेल्वे हद्दीत मंगळवारी घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये १७ प्रवाशांचे बळी गेले.

मुंबई : उपनगरीय रेल्वे हद्दीत मंगळवारी घडलेल्या अपघातांच्या घटनांमध्ये १७ प्रवाशांचे बळी गेले. यात रूळ ओलांडतानाच १0 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद लोहमार्ग पोलिसांकडे झाली आहे. तर तीन प्रवाशांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. कुर्ला, कल्याण, मुंबई सेंट्रल पोलीस ठाण्यात जास्त अपघातांची नोंद असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. रेल्वे अपघात कमी करण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात. यात दोन रुळांच्या मध्ये तारांचे कुंपण, रुळांजवळ असणाऱ्या झोपड्यांजवळ भिंतींचे कुंपण बांधण्यात येत आहे. महामंडळाने तर १२ स्थानकांच्या परिसरांत प्रवासी सुरक्षेसाठी १२0 कोटींची तरतूद केली आहे. मात्र या योजना करूनही रूळ ओलांडण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मंगळवारी तीन अपघात ट्रेनमधून पडून झाले. एकाचा डहाणू प्लॅटफॉर्मवर लोकलची ठोकर लागून मृत्यू झाला. तर अन्य तीन जणांचे मृत्यू हे नैसर्गिक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी) >सर्व स्थानकांजवळ बॅरिकेड्स टाकाजास्तीत जास्त अपघात रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना होत असल्याने अपघात रोखण्यासाठी सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांजवळ बॅरिकेड्स टाका, अशी सूचना उच्च न्यायालयाने रेल्वेला केली. ‘मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकना बॅरिकेड्स टाका. कारण जास्तीत जास्त मृत्यू रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना होतात,’ असे न्या. व्ही. एम. कानडे व न्या. स्वप्ना जोशी यांच्या खंडपीठाने म्हटले.हँकॉक पूल जुना झाल्याने रेल्वे प्रशासन व महापालिकेने हा पूल पाडला. मात्र पादचाऱ्यांची मोठी गैरसोय होत असल्याने सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने वरील सूचना रेल्वेला केली.हँकॉक पूल पाडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे रेल्वेनेही उच्च न्यायालयात मान्य केले. त्यामुळे या ठिकाणी बॅरिकेड्स टाकण्यात येतील, असे रेल्वेचे वकील सुरेश कुमार यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. रेल्वे पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार, गेल्या महिन्यात १५० लोकांचा मृत्यू ट्रॅक ओलांडताना झाला. तर २० सप्टेंबर रोजी १७ लोकांचा मृत्यू झाला. त्यातील आठ पश्चिम रेल्वे व नऊ जणांचा मृत्यू मध्य रेल्वेच्या हद्दीत झाला. >रेल्वे बोर्डातील अधिकाऱ्यांकडून आढावामुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची सूचना रेल्वे बोर्डाकडून पश्चिम व मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे. बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने बुधवारी मुंबईत रेल्वे स्थानकांना भेट देत प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती घेतली. त्या वेळी रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांवर न्यायालयीन प्रक्रियेऐवजी जागीच रेल्वे नियमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यावर भर देण्याचे सुचविले. त्यादृष्टीने पाऊल उचलण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून या वेळी सांगण्यात आले.मुंबई भेटीवर आलेल्या समितीत रेल्वे बोर्डाचे सल्लागार ए.एस. उपाध्याय, जेपीएस सिंह आणि अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता. या समितीकडून अंधेरी-जोगेश्वरी दरम्यानच्या फाटकाचीही पाहणी करण्यात आली.