शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

१७ जिल्ह्यांत नव्याने तयारी!

By admin | Updated: April 26, 2017 02:29 IST

७७ टक्क्यांच्या गोंधळामुळे द्वारपोच योजना वांध्यात

सदानंद सिरसाट - अकोलाशिधापत्रिकाधारकांना पुरवठा करावयाच्या धान्याची वाहतूक शासकीय गोदाम आणि दुकानांपर्यंत करण्यासाठी २०१२ पासून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून द्वारपोच योजनेला राज्यातील १७ जिल्ह्यात अपयश आले. आता या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. त्यावेळी पायाभूत दराच्या ७७ टक्क्यांपेक्षा अधिक दराच्या निविदा न स्वीकारण्याच्या अटीमुळे राज्यभरात गोंधळ निर्माण झाला होता. शिधापत्रिकाधारकांना पुरवठा केले जाणारे धान्य भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामापासून थेट रास्त भाव दुकानांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने २६ नोव्हेंबर २०१२ रोजी निविदा राबविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये नव्या निविदेनुसार काम सुरू झाले, तर मुंबई-ठाणे क्षेत्र आणि उर्वरित १७ जिल्ह्यांमध्ये हे काम करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये द्वारपोच योजना सुरूच झाली नाही. या ठिकाणी पर्यायी कंत्राटदार आणि वाहने अधिग्रहित करून गोदामापर्यंत वाहतूक करण्यात आली, तर गोदामातून दुकानांपर्यंतची वाहतूक दुकानदारांनी केली. आता तो प्रकार बंद करून शासकीय गोदाम आणि तेथून दुकानांपर्यंत म्हणजेच द्वारपोच धान्य पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. भ्रष्टाचार रोखण्याचा उपायसार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्याचा दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात अपहार होतो. त्यामध्ये बऱ्याच प्रकरणात वाहतूक कंत्राटदारांचाही सहभाग असतो. हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने धान्याची थेट दुकानांपर्यंत म्हणजेच द्वारपोच योजना सुरू केली. कंत्राटदारांनी संगनमताने रोखली योजनाशासनाची ही महत्त्वांकाक्षी योजना काही कंत्राटदारांनी संगनमताने अपयशी ठरविली. दर परवडत नाहीत, या कारणाखाली कंत्राटदारांनी १७ जिल्ह्यांमध्ये निविदा प्रक्रियेत सहभागच घेतला नाही. संगनमताच्या कुरघोडीवर शासनाचा उताराराज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये धान्य वाहतुकीसाठी निविदा न भरता संगनमताने शासनावरच कुरघोडी करण्याचा प्रकार वाहतूक कंत्राटदारांनी केला. त्यामध्ये राज्यातील नागपूर, गोंदिया, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अकोला, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यात द्वारपोच योजना सुरूच झाली नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी चांगलाच उतारा देत संगनमत करण्यासोबतच शासनाची कोंडी करणाऱ्यांची गोची केली आहे. खुल्या स्पर्धेतून मिळणार कामवाहतूक कंत्राटदार नेमताना आधी असलेल्या जाचक अटींमुळे सर्वसाधारण संस्था, व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होण्यापासूनच रोखण्यात आले होते. यावेळी २० एप्रिल रोजीच्या शासन आदेशात आधीच्या सर्व जाचक अटी व शर्ती काढून टाकत दराची स्पर्धा सर्वांसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे यावर्षी नक्कीच द्वारपोच योजना सुरू होण्याची चिन्हे आहेत.