शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

१७ जिल्ह्यांत नव्याने तयारी!

By admin | Updated: April 26, 2017 02:29 IST

७७ टक्क्यांच्या गोंधळामुळे द्वारपोच योजना वांध्यात

सदानंद सिरसाट - अकोलाशिधापत्रिकाधारकांना पुरवठा करावयाच्या धान्याची वाहतूक शासकीय गोदाम आणि दुकानांपर्यंत करण्यासाठी २०१२ पासून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतून द्वारपोच योजनेला राज्यातील १७ जिल्ह्यात अपयश आले. आता या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. त्यावेळी पायाभूत दराच्या ७७ टक्क्यांपेक्षा अधिक दराच्या निविदा न स्वीकारण्याच्या अटीमुळे राज्यभरात गोंधळ निर्माण झाला होता. शिधापत्रिकाधारकांना पुरवठा केले जाणारे धान्य भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामापासून थेट रास्त भाव दुकानांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाने २६ नोव्हेंबर २०१२ रोजी निविदा राबविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये नव्या निविदेनुसार काम सुरू झाले, तर मुंबई-ठाणे क्षेत्र आणि उर्वरित १७ जिल्ह्यांमध्ये हे काम करण्यासाठी कोणीच पुढे आले नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये द्वारपोच योजना सुरूच झाली नाही. या ठिकाणी पर्यायी कंत्राटदार आणि वाहने अधिग्रहित करून गोदामापर्यंत वाहतूक करण्यात आली, तर गोदामातून दुकानांपर्यंतची वाहतूक दुकानदारांनी केली. आता तो प्रकार बंद करून शासकीय गोदाम आणि तेथून दुकानांपर्यंत म्हणजेच द्वारपोच धान्य पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. भ्रष्टाचार रोखण्याचा उपायसार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्याचा दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणात अपहार होतो. त्यामध्ये बऱ्याच प्रकरणात वाहतूक कंत्राटदारांचाही सहभाग असतो. हे प्रकार रोखण्यासाठी शासनाने धान्याची थेट दुकानांपर्यंत म्हणजेच द्वारपोच योजना सुरू केली. कंत्राटदारांनी संगनमताने रोखली योजनाशासनाची ही महत्त्वांकाक्षी योजना काही कंत्राटदारांनी संगनमताने अपयशी ठरविली. दर परवडत नाहीत, या कारणाखाली कंत्राटदारांनी १७ जिल्ह्यांमध्ये निविदा प्रक्रियेत सहभागच घेतला नाही. संगनमताच्या कुरघोडीवर शासनाचा उताराराज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये धान्य वाहतुकीसाठी निविदा न भरता संगनमताने शासनावरच कुरघोडी करण्याचा प्रकार वाहतूक कंत्राटदारांनी केला. त्यामध्ये राज्यातील नागपूर, गोंदिया, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, अकोला, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, परभणी जिल्ह्यात द्वारपोच योजना सुरूच झाली नाही. अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी चांगलाच उतारा देत संगनमत करण्यासोबतच शासनाची कोंडी करणाऱ्यांची गोची केली आहे. खुल्या स्पर्धेतून मिळणार कामवाहतूक कंत्राटदार नेमताना आधी असलेल्या जाचक अटींमुळे सर्वसाधारण संस्था, व्यक्तींना त्यामध्ये सहभागी होण्यापासूनच रोखण्यात आले होते. यावेळी २० एप्रिल रोजीच्या शासन आदेशात आधीच्या सर्व जाचक अटी व शर्ती काढून टाकत दराची स्पर्धा सर्वांसाठी खुली करण्यात आली. त्यामुळे यावर्षी नक्कीच द्वारपोच योजना सुरू होण्याची चिन्हे आहेत.