शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

उड्डाणपूल उभारणीसाठी १७ कोटी खर्च

By admin | Updated: January 19, 2017 06:03 IST

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेचे वेळापत्रक स्थिर राहावे यासाठी स्थानक हद्दीत असणारे रेल्वे फाटक बंद केले जात आहे.

मुंबई : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि रेल्वेचे वेळापत्रक स्थिर राहावे यासाठी स्थानक हद्दीत असणारे रेल्वे फाटक बंद केले जात आहे. त्याऐवजी रेल्वे व स्थानिक पालिकांच्या सहकार्याने रोड उड्डाणपूल (आरओबी) उभारले जात आहे. मात्र, शासकीय उदासीनतेमुळे हे पूल अजूनही अर्धवट अवस्थेत असून आतापर्यंत १७ कोटी रुपये पुलांच्या कामावर खर्च करण्यात आले आहेत. मध्य रेल्वे मार्गावर कळवा-खारेगाव, आंबिवली, ठाकुर्ली, चुनाभट्टी येथे रेल्वे फाटक आहेत. स्थानिक वाहतुकीसाठी फाटक दोन ते तीन मिनिटे सुरू राहिल्यास लोकल फेऱ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे फेऱ्यांना लेटमार्क लागण्यासह वेळापत्रक बिघडते. काही वेळेला तर लोकल फेऱ्या रद्दही कराव्या लागतात. महत्त्वाची बाब म्हणजे फाटकांच्या ठिकाणी अनेकदा अपघातांनाही तोंड द्यावे लागते. त्यामुळे फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्याचे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. यात स्थानिक पालिकांचीही मदत घेतली जात असून सुरुवातीला खारेगाव आणि शहाड-आंबिवली येथेही उड्डाणपूल उभारले जात आहे. प्रस्तावानुसार रेल्वेच्या हद्दीतील उड्डाणपुलांचे बांधकाम रेल्वे, तर पालिकेच्या हद्दीतील बांधकामाची जबाबदारी ही पालिकेकडे आहे. शहाड-आंबिवली दरम्यान उड्डाणपुलाचे काम २0१५पासून सुरू करण्यात आले. त्यासाठी आतापर्यंत रेल्वेचे नऊ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून अजूनही पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. दोन आठवड्यांपूर्वी खारेगावजवळीलही फाटक बंद करून उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू केले असून, या कामासाठीही साडेआठ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. खारेगाव येथे उड्डाणपूल उभारण्याचा एकूण खर्च १७ कोटी रुपये एवढा आहे. या कामात आतापर्यंत रेल्वेकडून गर्डर उभारण्यात आला असून उर्वरित काम हे ठाणे पालिकेकडून केले जाईल; परंतु अजूनही काम पुढे सरकलेले नाही. (प्रतिनिधी)महापालिकेकडून पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी कोणतीही तयारी केलेली नाही. त्यामुळे हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल हे सांगणे कठीण आहे. - रवींद्र गोयल (मध्य रेल्वे-विभागीय रेल्वे व्यवस्थापक)