शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

१६८ सरकारी अभियोक्त्यांना स्थायी नियुक्ती आदेशाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 19:09 IST

न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये आरोपींच्या शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी राज्य सरकार आग्रही असले तरी त्यासाठी न्यायालयात लढा देणाऱ्या सरकारी वकिलांच्या

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 18 - न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये आरोपींच्या शिक्षेचे प्रमाण वाढावे यासाठी राज्य सरकार आग्रही असले तरी त्यासाठी न्यायालयात लढा देणाऱ्या सरकारी वकिलांच्या समस्यांकडे मात्र सरकारकडून दुर्लक्ष होत असल्याचा सूर आहे. राज्यातील १६८ सरकारी अभियोक्ते परिविक्षाधीन कार्यकाळ संपल्याने सुमारे वर्षभरापासून स्थायी नियुक्ती आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यात सन २०१३ ला १६८ सहायक सरकारी अभियोक्त्यांची (वर्ग-१) नियुक्ती करण्यात आली. दोन वर्षे त्यांचा परिविक्षाधीन कार्यकाळ होता. हा कार्यकाळ मागच्या वर्षीच संपला. त्यानंतर लगेच त्यांना स्थायी नियुक्ती आदेश मिळणे अपेक्षित होते. मात्र गेल्या वर्षभरात त्यांना हे आदेश देण्यात आलेले नाही. हे आदेश का रोखले याचे समाधानकारक उत्तरही संचालक, अभियोग महासंचालनालय मुंबई या कार्यालयाकडून दिले जात नसल्याची ओरड आहे. मुळात संचालकाचे हे पद अतिरिक्त प्रभारावर चालविले जात आहे. सन २०११ च्या तुकडीतील सरकारी अभियोक्त्यांना गतवर्षी २०१५ मध्ये आदेश दिले गेले. आता २०१३ ची तुकडी या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. आणखी १७४ ची भरती पुन्हा २०१४ च्या तुकडीत १७४ सरकारी अभियोक्त्यांची निवड झाली आहे. मात्र अद्याप त्यांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या नाहीत. यावरूनही नाराजी दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी) कनव्हीक्शन रेटवर मुख्यमंत्री घेणार आढावा राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २८ आॅक्टोबर रोजी अमरावती येथे परिक्षेत्राच्या पाचही जिल्ह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेत आहे. त्यात वाढती गुन्हेगारी, डिटेक्शन, गुन्ह्यांंना प्रतिबंध, कायदा व सुव्यवस्था, दारूबंदी, मुद्देमाल परत करणे, आगामी निवडणूका, मोक्का-एमपीडीए, प्रतिबंधात्मक कारवाई आणि न्यायालयीन खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण अशा विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक निर्माण व्हावा म्हणून अधिकाधिक खटल्यांमध्ये आरोपींना शिक्षा व्हावी या दृष्टीने शासनाचे प्रयत्न आहे. शिक्षेचा हा दर (कनव्हीक्शन रेट) वाढावा यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सतीश माथुर आग्रही आहेत. शिक्षेचा दर वाढावा म्हणून पोलीस आणि सरकारी वकीलांच्या स्तरावर प्रयत्न केले जातात. तर अभ्यासपूर्ण आणि त्रुट्यामुक्त दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यावर पोलिसांचा भर राहातो. सरकारी वकील त्यांच्या क्षमतेनुसार प्रयत्नही करतात. परंतु अनेकदा त्यांच्या ह्यपरफॉर्मन्सह्णवर प्रश्नचििन्ह लावले जाते. सरकार ह्यकनव्हीक्शन रेटह्ण वाढविण्यासाठी आग्रही असताना त्यासाठी लढणाऱ्या सरकारी अभियोक्त्यांच्या समस्याही मुख्यमंत्र्यांच्या २८ आॅक्टोबरच्या प्रस्तावित बैठकीच्या निमित्ताने पुढे आल्या आहेत.प्रोबेशन पूर्ण झालेल्या सरकारी अभियोक्त्यांची यादी बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही यादी गृह विभागाला पाठविली जाईल. तेथून स्थायी नियुक्त्यांचा निर्णय होईल. राज्य लोकसेवा आयोगाकडून १७४ नव्या सरकारी अभियोक्त्यांची यादी प्राप्त झाली आहे. त्यांची कागदपत्रे तपासणी, ववैद्यकीय बोर्डाकडील तपासणीनंतर त्यांना नियुक्त्या दिल्या जातील. मात्र या प्रक्रियेला वेळ लागणार आहे.- आर.एस. चरकेप्रभारी संचालक, अभियोग महासंचालनालय, मुंबई.