शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

167 गृहरक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन उधळून लावले

By admin | Updated: July 28, 2016 17:10 IST

2010 चा शासन आदेश रद्द करण्यासह विविध मागण्यांकरिता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गृहरक्षकांनी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. २८ : 2010 चा शासन आदेश रद्द करण्यासह विविध मागण्यांकरिता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गृहरक्षकांनी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाच्या नेतृत्वात राज्यव्यापी आंदोलन पुकारले होते. त्या आंदोलनाकरिता घेतलेली परवानगी संपली असल्याचे म्हणत पोलिसांनी गुरुवारी 167 आंदोलकांना ताब्यात घेतले. राज्यकर्त्यांच्या हस्तक्षेपामुळे सदर आंदोलन दडपल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.

गत 15 दिवसांपासून गृहरक्षकांनी 12 वर्ष सेवा झालेल्यांना सेवेतून कमी करणे व पुनर्नियुक्तीकरिता लादलेल्या जाचक अटी रद्द करण्याकरिता आंदोलन पुकारले होते. यात शासनाने 2016 च्या आदेशाला स्थगिती दिली होती. मात्र 2010 शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम होते. अशातच 25 जुलै रोजी आंदोलनाकरिता घेतलेली परवानगी संपली. आंदोलकांनी पुन्हा परवानगी अर्ज सादर केला. मात्र पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करत परवानगी नाकारली. यामुळे आंदोलकांना पोलिसांनी आंदोलन स्थगित करण्याच्या सूचना बुधवारी देत 10 मिनिटाची वेळ दिली होती.

आंदोलकांनी आपली भूमिका कायम ठेवल्याने पोलिसांनी 522 जणांविरुद्ध 135 कलमानुसार गुन्हे दाखल केले होते. आज पोलिसांनी 167 आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलन उधळून लावले. ताब्यात घेतलेल्या महिला आंदोलकांना सेवाग्राम येथील रुग्णालयात तर पुरुष आंदोलकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आरोग्य तापासणीकरिता पाठविण्यात आले आहे.