शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

भूविकास बँकेचे १६२४ कोटी शासनाकडे थकीत

By admin | Updated: August 28, 2014 02:08 IST

केंद्र आणि राज्य शासनाने घोषित केलेल्या व्याजमाफी सवलतीचा एक छदामही राज्यातील भूविकास बँकांना मिळाला नाही. सोबतच विविध योजनांचा लाभ देण्यास देखील टाळाटाळ होत आहे.

व्याजमाफीचा लाभ नाही : १३०० कर्मचारी वेतनापासून वंचित रूपेश उत्तरवार - यवतमाळ केंद्र आणि राज्य शासनाने घोषित केलेल्या व्याजमाफी सवलतीचा एक छदामही राज्यातील भूविकास बँकांना मिळाला नाही. सोबतच विविध योजनांचा लाभ देण्यास देखील टाळाटाळ होत आहे. त्यामुळे तब्बल एक हजार ६२४ कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्याने भूविकास बँका अडचणीत आल्या असून १३०० कर्मचाऱ्यांचे वेतन २७ महिन्यांपासून रखडले आहे.राज्यातील भूविकास बँका आर्थिक अडचणीत सापडल्याने २००१ पासून बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांसोबतच बँकांचे कर्मचारी देशोधडीला लागले आहेत. आता तर या बँका कायमस्वरूपी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे बँकेला १७९१ कोटी सरकारला द्यायचे आहे. प्रत्यक्षात दोन्ही बाजू लक्षात घेतल्यास या व्यवहारात केवळ १६७ कोटी रूपयांची तफावत आहे. इतकेच नव्हे तर शासनाने अल्प मुदत कर्जावरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. लघुगटाची ही शिफारस मान्य केली आहे. त्यानुसार बँकेला ७२२ कोटी रूपये मिळणे अपेक्षित आहे. ओटीएस योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात आली. यामध्ये होणारा तोटा शासन निर्णयानुसार राज्य शासन सोसणार आहे. ही रक्कम १४५ कोटींच्या घरात आहे. शासनाच्या विविध योजना राबविल्याने बँकेला ३१६ कोटींचा तोटा आला. ही रक्कम राज्यशासनाने बँकेला द्यावी लागणार आहे. मात्र ही रक्कम मिळालीच नाही. त्यामुळे बँक अडचणीत आली आहे. नाबार्डने १२३ कोटींचे व्याज माफ केले. या व्याजावरील व्याज १०४ कोटींचे आहे. ओटीएस योजनेचे ४०६ कोटी रूपये आणि राखीव निधीचे ४६ कोटी रूपये अद्याप मिळायचे आहेत. या संपूर्ण जमाखर्चाचा अहवाल चौगुले समितीने राज्य शासनाकडे सादर केला असून बँक सुरू करण्याची शिफारस केली आहे.