शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
2
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
3
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
4
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
5
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
6
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
7
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
9
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
10
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
11
पाकिस्तान सुधरेना, जम्मू विमानतळावर हल्ल्याचा प्रयत्न, नियंत्रण रेषेपलीकडून भीषण गोळीबार
12
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट
13
Video: सायरन वाजले!! पाकिस्तानची ८ मिसाईल्स भारताने पाडली, 'नापाक' हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर
14
IPL 2025 PBKS vs DC : पंजाब-दिल्ली यांच्यातील सामना अचानक थांबवण्याची वेळ: नेमकं काय घडलं?
15
Mumbai Metro: उद्यापासून आरे ते वरळी मेट्रो धावणार; मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
16
दोन वेगवेगळे Uniform; कर्नल सोफिया अन् विंग कमांडर व्योमिका यांच्या गणवेशातून मोठा संदेश
17
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
18
मैत्रिणींनी केला घात! ठाण्यात नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर सामूहिक बलात्कार
19
लालू प्रसाद यादव पुन्हा अडचणीत; राष्ट्रपतींनी 'या' प्रकरणात खटला चालवण्याची दिली परवानगी
20
घायाळ पाकिस्तानला अल कायदाची साथ, भारतात 'जिहाद फी सबीलिल्लाह' करण्याची दिली धमकी   

१६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: April 13, 2015 11:39 IST

वाढत्या तापमानासोबतच भूजल पातळी झपाट्याने खालावत असून, अमरावती विभागातील १६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत

अकोला : वाढत्या तापमानासोबतच भूजल पातळी झपाट्याने खालावत असून, अमरावती विभागातील १६ तालुक्यांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विभागातील ५६पैकी १६ तालुक्यांमध्ये मार्चअखेर १ मीटरपर्यंत भूजल पातळी खालावल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाने नोंदविले आहे. तर २ तालुक्यांमध्ये २ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट झाल्याचे समोर आले आहे.गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने अकोला जिल्ह्यातील धरणांमध्ये अत्यल्प जलसाठा आहे़ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ४५८ गावांसाठी ५८२ उपाययोजनांच्या कामांचा कृती आराखडा तयार करण्यात आला. ११ कोटी ८३ लाख ३२ रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या कृती आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांनी गतवर्षी डिसेंबरमध्ये मंजुरी दिली होती. आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी एकूण ११० कामांना जिल्हाधिकाऱ्यांकडून ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यामध्ये २१ कूपनलिका, ६९ विंधन विहिरी, ३ तात्पुरत्या पूरक नळ योजनांची दुरुस्ती, ७ नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि १० विहिरींचे अधिग्रहण आदींंचा समावेश आहे. गत आॅक्टोबरअखेरपर्यंत ३ तालुक्यांतील पाणीपातळीत घट झाली असून, उर्वरित ४ तालुक्यांत मात्र भूजल पातळीत वाढ झाल्याचे चित्र आहे.