शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री छगन भुजबळांना खाते मिळाले; आदेशाचा फोन खणखणताच लागलीच मुंबईकडे निघाले...
2
ज्यांनी ट्रेनिग दिले त्यांनाच डसला! AI ने मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या घालविल्या
3
मुंबई-दिल्ली महामार्गावर कार थांबवली, महिलेसोबत सुरू केले अश्लील चाळे, भाजपा नेत्याचा व्हिडीओ व्हायरल 
4
२५ लाख रोजगार, ७५ हजार कोटींची गुंतवणूक! मुकेश अंबानी 'या' राज्यातील तरुणांचं बदलणार भविष्य
5
भारत पाकिस्तानला आणखी एक दणका देण्याच्या तयारीत; FATF ग्रे लिस्टमध्ये येणार पाक...
6
'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?
7
Ritual: 'हुंडा देणे' ही कुप्रथा भारतीय संस्कृतीत वा इतिहासात नव्हतीच, मग आली कुठून?
8
शेअर मार्केटमध्ये पैसे बुडाले? डिमॅट अकाउंट कायमचं कसं बंद करायचं? 'ही' आहे सोपी पद्धत
9
पीडित तरुणीचे आरोपीवर प्रेम, लग्नही केले; सर्वोच्च न्यायालयाला बदलावा लागला आपलाच निर्णय...
10
बीडमधील पवनचक्की प्रकल्प पुन्हा चर्चेत; सुरक्षारक्षकांचा चोरट्यांवर गोळीबार, एक ठार
11
मोठी घटना! भारतीय खासदारांचे विमान लँड होणार, तेवढ्यात युक्रेनने विमानतळावर केला हल्ला
12
"तिला घटस्फोट दे, नाहीतर तुला जिवे मारू’’, पत्नीच्या प्रियकराने दिलेल्या धमकीमुळे पती घाबरला, त्यानंतर...  
13
बिटकॉइन म्हणजे काय? ते कोण बनवतं? बँकेशिवाय कसं काम करतं? वाचा!
14
Vaishnavi Hagawane Death Case : राजेंद्र हगवणे अटकेआधी कुठे-कुठे फिरला?, समोर आली मोठी माहिती
15
मोठा खुलासा! ज्योती मल्होत्राने देशातील 'या' प्रसिद्ध मंदिरात घेतलेलं दर्शन, फोटोही कढले अन्...
16
IPL 2025 गाजवून बिहारच्या घरी परतला वैभव सूर्यवंशी; साऱ्यांनी केलं धमाकेदार स्वागत (Video)
17
2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल
18
'पाकिस्तान जिंदाबाद,' चिकलठाण्यात शिकाऊ कामगाराचे कंपनीतील मशीनवर देशद्रोही लिखाण!
19
‘हुंडामुक्त महाराष्ट्र - हिंसामुक्त कुटुंब’, सुप्रिया सुळे यांनी केला राज्यव्यापी लढ्याचा निर्धार, २२ जून पासून होणार सुरुवात
20
'शालू'च्या नव्या डान्सने घातला इंटरनेटवर धुमाकूळ, राजेश्वरीच्या मॉडर्न लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा

बाईक अपघातात १६ महिन्यांत ३४८ जणांचा मृत्यू

By admin | Updated: May 22, 2016 16:41 IST

गेल्या १६ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात सोळाशेहून अधिक अपघात झाले

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 22- नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. परंतु त्याचे पालन न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. गेल्या १६ महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात सोळाशेहून अधिक अपघात झाले आणि यात ३४८ नागरिकांना जीव गेलाय तर गेल्या १६ महिन्यांत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७९ हजारहून अधिक नागरिकांना दंड करण्यात आला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात घडलेले गुन्हे, दंडातून प्राप्त झालेला महसूल, हेल्मेट कारवाई, अपघातांत झालेले मृत्यू इत्यादी प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत नागपुरात १ हजार ६७१ अपघात झाले. यात ३५८ नागरिकांचा मृत्यू झाला तर १ हजार ७२८ नागरिक जखमी झाले. डोक्याला मार लागून झालेल्या मृत्यूची माहितीच नाहीगेल्या काही महिन्यांपासून हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कारवाईचे प्रमाण वाढीस लागले आहे. हेल्मेट न घातलेल्या ७९ हजार ७७७ नागरिकांवर कारवाई करण्यात आली व यातून १३ लाख ७३ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कालावधीत झालेल्या अपघातांमध्ये नेमक्या किती नागरिकांचा डोक्याला मार लागून मृत्यू झाला याची मात्र वाहतूक विभागाकडे कुठलीही माहिती उपलब्ध नाही. हेल्मेटप्रकरणी २५२ पोलिसांवर कारवाई१ जानेवारी २०१५ ते ३० एप्रिल २०१६ या कालावधीत २५२ पोलिसांवर हेल्मेट न घातल्याबाबत कारवाई करण्यात आली. यासंदर्भात २५ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांवर कारवाई करत असताना पोलीसांकडून नियमांचे पालन का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.