शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

१६ संचालक, अधिकाऱ्यांना तुरुंगवास

By admin | Updated: February 8, 2017 05:13 IST

राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी

अंबाजोगाई : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी ठरवत प्रत्येकी पाच वर्षे तुरुंगवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर तिघे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असून उर्वरित १५ जणांना न्यायालयाने निर्दोष ठरविले. शिक्षा झालेल्यांमध्ये माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह आठ संचालक व बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्हा बँकेतर्फे २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे बेकायदेशीर कर्जवाटप केल्याचे हे प्रकरण आहे. घाटनांदूर येथील शेतकरी सहकारी तेलबिया कृषी प्रक्रिया संस्थेस या बँकेने २०११ साली २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर केले होते. या कर्ज प्रकरणाचे विभागीय लेखा परीक्षक रवींद्र गोदाम यांनी लेखा परीक्षण केले. त्यात प्रक्रिया संस्थेने बोगस सभासद दाखवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. गोदाम यांनी ३० जून २०११ रोजी ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ३४ जणांवर फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार करून विश्वासघात केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता. प्राथमिक तपास अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक बी.आर. गित्ते यांनी केला. उच्च न्यायालयाने एसआयटीमार्फत तपासाचे आदेश दिल्यानंतर उपअधीक्षक स्वाती भोर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या संस्थेस कर्ज देताना बँकेच्या अध्यक्षांनी उपकर्ज समितीतील ८ सदस्यांची बैठक ही बँकेच्या मुख्यालयातील मंथन या सभागृहात न घेता नायगाव येथील शासकीय विश्रामगृहात घेतली असल्याचे स्पष्ट झाले होते. ही बैठक केवळ कागदोपत्रीच असावी, असा जबाब कर्ज उपसमितीचे सदस्य विलास सोनवणे व विलास बडगे यांनी दिला होता. न्यायालयाने ५१ साक्षीदारांची तपासणी केली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)पाच जणांनी उचलले २ कोटी ७५ लाख२ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम संस्थेच्या घाटनांदूर शाखेच्या नावावर मंजूर झाली. घाटनांदूर येथील शाखाधिकाऱ्यांनी ही रक्कम देण्यास नकार दर्शविल्याने परळीच्या शाखेतून ही रक्कम केदारेश्वर स्टील इंडस्ट्रीजचे जनार्दन डोळे (५५ लाख), रंगनाथ देसाई (४१ लाख ४० हजार), सुनील मसवले (४५ लाख), रमेश मुंडे (४५ लाख) यांनी ही सर्व रक्कम संस्थेच्या खात्यावरून स्वत:च्या ताब्यात घेतली व संस्थेच्या पैशाचा अपहार केला. म्हणून या पाच जणांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. जामिनासाठी भरले १ कोटी २० लाख रुपयेबँक घोटाळा प्रकरणात एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील ३१ आरोपींना अटक झाली होती. त्यांच्याकडून जामिनासाठी उच्च न्यायालयाने १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम भरून घेतली होती. या रकमेचा भरणा झाल्यानंतरच या सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. प्रभू गुट्टे, सतीश जायभाये व अशोक बहिरवाल हे तीन आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. घोटाळा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांची विशेष अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ५० साक्षीदार तपासून सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले.