शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

१६ संचालक, अधिकाऱ्यांना तुरुंगवास

By admin | Updated: February 8, 2017 05:13 IST

राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी

अंबाजोगाई : राज्यभर गाजलेल्या बीड जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मंगळवारी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वी.म.सुंदाळे यांनी १६ जणांना दोषी ठरवत प्रत्येकी पाच वर्षे तुरुंगवास व ६० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. तर तिघे गुन्हा नोंद झाल्यापासून फरार असून उर्वरित १५ जणांना न्यायालयाने निर्दोष ठरविले. शिक्षा झालेल्यांमध्ये माजी अध्यक्ष राजाभाऊ मुंडे यांच्यासह आठ संचालक व बँक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बीड जिल्हा बँकेतर्फे २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे बेकायदेशीर कर्जवाटप केल्याचे हे प्रकरण आहे. घाटनांदूर येथील शेतकरी सहकारी तेलबिया कृषी प्रक्रिया संस्थेस या बँकेने २०११ साली २ कोटी ७५ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज प्रकरण मंजूर केले होते. या कर्ज प्रकरणाचे विभागीय लेखा परीक्षक रवींद्र गोदाम यांनी लेखा परीक्षण केले. त्यात प्रक्रिया संस्थेने बोगस सभासद दाखवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याचे समोर आले. गोदाम यांनी ३० जून २०११ रोजी ग्रामीण ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ३४ जणांवर फसवणूक व बनावट कागदपत्रे तयार करून विश्वासघात केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल झाला होता. प्राथमिक तपास अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक बी.आर. गित्ते यांनी केला. उच्च न्यायालयाने एसआयटीमार्फत तपासाचे आदेश दिल्यानंतर उपअधीक्षक स्वाती भोर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या संस्थेस कर्ज देताना बँकेच्या अध्यक्षांनी उपकर्ज समितीतील ८ सदस्यांची बैठक ही बँकेच्या मुख्यालयातील मंथन या सभागृहात न घेता नायगाव येथील शासकीय विश्रामगृहात घेतली असल्याचे स्पष्ट झाले होते. ही बैठक केवळ कागदोपत्रीच असावी, असा जबाब कर्ज उपसमितीचे सदस्य विलास सोनवणे व विलास बडगे यांनी दिला होता. न्यायालयाने ५१ साक्षीदारांची तपासणी केली. सरकार पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)पाच जणांनी उचलले २ कोटी ७५ लाख२ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम संस्थेच्या घाटनांदूर शाखेच्या नावावर मंजूर झाली. घाटनांदूर येथील शाखाधिकाऱ्यांनी ही रक्कम देण्यास नकार दर्शविल्याने परळीच्या शाखेतून ही रक्कम केदारेश्वर स्टील इंडस्ट्रीजचे जनार्दन डोळे (५५ लाख), रंगनाथ देसाई (४१ लाख ४० हजार), सुनील मसवले (४५ लाख), रमेश मुंडे (४५ लाख) यांनी ही सर्व रक्कम संस्थेच्या खात्यावरून स्वत:च्या ताब्यात घेतली व संस्थेच्या पैशाचा अपहार केला. म्हणून या पाच जणांचाही आरोपींमध्ये समावेश आहे. जामिनासाठी भरले १ कोटी २० लाख रुपयेबँक घोटाळा प्रकरणात एकूण ३४ जणांवर गुन्हे दाखल झाले होते. यातील ३१ आरोपींना अटक झाली होती. त्यांच्याकडून जामिनासाठी उच्च न्यायालयाने १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम भरून घेतली होती. या रकमेचा भरणा झाल्यानंतरच या सर्व आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला होता. प्रभू गुट्टे, सतीश जायभाये व अशोक बहिरवाल हे तीन आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. घोटाळा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन न्यायालयाने अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांची विशेष अभियोक्ता म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी ५० साक्षीदार तपासून सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले.