शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

निविदेतच अडकल्या १,५00 नवीन गाड्या

By admin | Updated: February 6, 2017 03:00 IST

प्रवाशांच्या सेवेसाठी’असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाला प्रवाशांच्या सेवेचा विसर पडला आहे. दरवर्षी नवीन बसेस एसटीच्या कार्यशाळेत तयार करून त्या ताफ्यात आणल्या जातात

मुंबई : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’असे ब्रीदवाक्य असणाऱ्या एसटी महामंडळाला प्रवाशांच्या सेवेचा विसर पडला आहे. दरवर्षी नवीन बसेस एसटीच्या कार्यशाळेत तयार करून त्या ताफ्यात आणल्या जातात. मात्र, या वेळी नवीन बसेस एसटी कार्यशाळेत न तयार करता, बाहेरून तयार करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. किचकट निविदा प्रक्रियेमुळे १,५00 नवीन बसेस अद्यापही एसटीत दाखल झालेल्या नाहीत. त्यामुळे जुन्या बसमधूनच एसटीचा प्रवास सुरू आहे. एसटी महामंडळाकडे १८,५00 बसेसचा ताफा आहे. यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात बसेस भंगारात काढून नवीन बसेस ताफ्यात दाखल केल्या जातात आणि काही बसेसची पुनर्बांधणीही केली जाते. नियमानुसार, १0 लाख किलोमीटर धावलेल्या किंवा ९ वर्षे धावलेल्या बसेस भंगारात काढून पूर्णत: नवीन बसेस तयार केल्या जातात. तर ७ किंवा ८ लाख किलोमीटर धावलेल्या बसेसची पुनर्बांधणी केली जाते. अशाप्रकारे, प्रत्येक वर्षी जवळपास ३ हजार बसेस ताफ्यातून बाहेर पडतात. यातील १,५00 बसेस नवीन, तर १,५00 बसेची पुनर्बांधणी करून त्या ताफ्यात दाखल करण्यात येतात. पुण्यातील एसटीच्या दापोडी, औरंगाबादमधील चिखलठाणा आणि नागपूरमधील हिंगणे येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत तीन हजार बसेसचे काम चालत होते. मात्र, एसटी महामंडळाने बस बांधण्यासाठी होणारा खर्च कमी करतानाच उत्तम दर्जाच्या १,५00 नवीन बसेस ताफ्यात आणण्यासाठी बस बाहेरून तयार करून घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी चार महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया सुरू केली. मात्र, किचकट निविदा प्रक्रियेमुळे अजूनही नवीन बस ताफ्यात दाखल होऊ शकल्या नाहीत. बसची निविदा प्रक्रिया पार पाडल्यानंतर, त्याच्या बांधणीला सुरुवात होऊन बस आतापर्यंत ताफ्यात दाखल होणे गरजेचे होते, परंतु तसे होऊ न शकल्याने, एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या गर्दीच्या हंगामात पुरता बोजवारा उडण्याची शक्यता आहे.