शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

सहा तासात १५ हजार युनिट विजेची बचत

By admin | Updated: August 11, 2014 00:54 IST

सध्या संपूर्ण महाराष्ट्र वीजसंकटाचा सामना करीत आहे. लोडशेडिंगच्या नावाखाली अनेक गाव अंधारात रात्र काढत आहे. मात्र त्याच वेळी नागपुरातील एका संस्थेने विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सहा तासांत

वीजसंकटावर पर्याय : ‘ग्रीन व्हिजिल’चा उपक्रम नागपूर : सध्या संपूर्ण महाराष्ट्र वीजसंकटाचा सामना करीत आहे. लोडशेडिंगच्या नावाखाली अनेक गाव अंधारात रात्र काढत आहे. मात्र त्याच वेळी नागपुरातील एका संस्थेने विशेष उपक्रमाच्या माध्यमातून सहा तासांत १५ हजार ४११ युनिट विजेची बचत केली आहे. या उपक्रमाचे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कौतुक केले जात आहे. ‘ग्रीन व्हिजिल’असे त्या संस्थेचे नाव आहे. ही संस्था गत अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करीत आहे. कोळशाचा मर्यादित साठा, पाण्याची टंचाई व वाढते प्रदूषण या ज्वलंत समस्या लक्षात घेता, या संस्थेने नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने गत जानेवारी २०१४ पासून शहरात हा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रात्री ८ ते ९ वाजता दरम्यान शहरातील एका भागातील पथदिवे बंद केले जातात. शिवाय संस्थेचे पदाधिकारी लोकांच्या घरोघरी फिरून वीज बचतीचे महत्त्व पटवून देतात. यातून तब्बल ३२ हजार नागरिक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. ते नागरिक आता स्वत:च्या घरातील अनावश्यक लाईट काही वेळासाठी बंद ठेवून, वीज बचतीस हातभार लावत आहे. अशाप्रकारे १५ जानेवारी २०१४ रोजी नागपुरात पहिला प्रयोग राबविण्यात आला. यानंतर १४ फेब्रुवारी २०१४ रोजी दुसरा, १६ एप्रिल रोजी तिसरा, १५ मे रोजी चौथा, १३ जून रोजी पाचवा व १२ जुलै रोजी सहावा उपक्रम राबविण्यात आला. यातून आजपर्यंत एकूण १५ हजार ४११ युनिट विजेची बचत झाली आहे. विशेष म्हणजे, एक युनिट वीज उत्पादित करण्यासाठी साधारण ५०० ग्रॅम कोळसा व ७.५ लिटर पाणी लागते. म्हणजेच १५ हजार ४११ युनिट विजेच्या बचतीसह ७ हजार ७०६ किलो कोळसा व १ लाख १५ हजार ५८५ लिटर पाण्याची बचत झाली आहे. शिवाय १५ हजार युनिट वीज तयार करताना वातावरणात पसरणाऱ्या हजारो किलो कार्बनडाय आॅक्साईडपासूनही बचाव झाला आहे. (प्रतिनिधी)