शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

मुंबईतील १५ टक्के पाणीकपात अखेर पालिकेकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 05:38 IST

गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजमितीला ६४ टक्के अधिक पाणीसाठा जमा झाला

मुंबई : धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजमितीला ६४ टक्के अधिक पाणीसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे गेले वर्षभर सुरू असलेली मुंबईतील १५ टक्के पाणीकपात पालिका प्रशासनाने बुधवारी मागे घेतली़ मात्र, सध्याचा पाणीसाठा क्षमतेच्या केवळ ५५ टक्के असल्याने केवळ राजकीय दबावामुळे प्रशासनाने पाणीकपात रद्द करण्याची घाई केल्याचे समजते़महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी असल्याने पाणीकपात लवकरात लवकर रद्द करून घेण्यासाठी शिवसेना व भाजपाच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होती़ मात्र, सध्या तलावांच्या एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर क्षमतेपैकी केवळ ७ लाख ९३ हजार ०५१ दशलक्ष लीटर पाणीसाठा असल्याने आणखी महिनाभर तरी वाट पाहण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती़ अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून तसे स्पष्ट केले होते़ गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा ३३ टक्के जादा पाऊस जुलै महिन्यापर्यंत झाला आहे़ त्यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सध्या ६४ टक्के जादा पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ त्या आधारावर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी अचानक पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली़ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नसताना पाणीकपात रद्द करणे हा उतावीळपणा ठरू शकतो़ प्रशासनाने केवळ राजकीय दबावाला बळी पडत हा निर्णय घेतल्याचे समजते़ (प्रतिनिधी)>व्यावसायिक पाणीकपातही रद्द व्यावसायिक पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यात आली होती़, तर जलतरण तलावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता़ हा पुरवठाही आता पूर्ववत होईल.पाणीपुरवठा आजपासून पूर्ववत होणार : गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून १५ टक्के पाणीकपात सुरू असल्याने ३,२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़ ही कपात रद्द झाल्याने मुंबईकरांना आता दररोज पूर्वीप्रमाणेच ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होणार आहे़ सध्या केवळ १६७ दिवसांचा पाणीसाठा : मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे अपेक्षित आहे़ म्हणजेच ३६५ दिवसांचा साठा हवा आहे़ मात्र आजमितीस १६७ दिवसांचा पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ पावसाळ््याचे अद्याप दोन महिने आहेत. ते संपण्याआधीच पाणीकपात रद्द करणे हा उतावीळपणा ठरू शकतो़