शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

मुंबईतील १५ टक्के पाणीकपात अखेर पालिकेकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 05:38 IST

गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजमितीला ६४ टक्के अधिक पाणीसाठा जमा झाला

मुंबई : धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजमितीला ६४ टक्के अधिक पाणीसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे गेले वर्षभर सुरू असलेली मुंबईतील १५ टक्के पाणीकपात पालिका प्रशासनाने बुधवारी मागे घेतली़ मात्र, सध्याचा पाणीसाठा क्षमतेच्या केवळ ५५ टक्के असल्याने केवळ राजकीय दबावामुळे प्रशासनाने पाणीकपात रद्द करण्याची घाई केल्याचे समजते़महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी असल्याने पाणीकपात लवकरात लवकर रद्द करून घेण्यासाठी शिवसेना व भाजपाच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होती़ मात्र, सध्या तलावांच्या एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर क्षमतेपैकी केवळ ७ लाख ९३ हजार ०५१ दशलक्ष लीटर पाणीसाठा असल्याने आणखी महिनाभर तरी वाट पाहण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती़ अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून तसे स्पष्ट केले होते़ गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा ३३ टक्के जादा पाऊस जुलै महिन्यापर्यंत झाला आहे़ त्यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सध्या ६४ टक्के जादा पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ त्या आधारावर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी अचानक पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली़ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नसताना पाणीकपात रद्द करणे हा उतावीळपणा ठरू शकतो़ प्रशासनाने केवळ राजकीय दबावाला बळी पडत हा निर्णय घेतल्याचे समजते़ (प्रतिनिधी)>व्यावसायिक पाणीकपातही रद्द व्यावसायिक पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यात आली होती़, तर जलतरण तलावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता़ हा पुरवठाही आता पूर्ववत होईल.पाणीपुरवठा आजपासून पूर्ववत होणार : गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून १५ टक्के पाणीकपात सुरू असल्याने ३,२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़ ही कपात रद्द झाल्याने मुंबईकरांना आता दररोज पूर्वीप्रमाणेच ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होणार आहे़ सध्या केवळ १६७ दिवसांचा पाणीसाठा : मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे अपेक्षित आहे़ म्हणजेच ३६५ दिवसांचा साठा हवा आहे़ मात्र आजमितीस १६७ दिवसांचा पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ पावसाळ््याचे अद्याप दोन महिने आहेत. ते संपण्याआधीच पाणीकपात रद्द करणे हा उतावीळपणा ठरू शकतो़