शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील १५ टक्के पाणीकपात अखेर पालिकेकडून रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 05:38 IST

गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजमितीला ६४ टक्के अधिक पाणीसाठा जमा झाला

मुंबई : धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये आजमितीला ६४ टक्के अधिक पाणीसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे गेले वर्षभर सुरू असलेली मुंबईतील १५ टक्के पाणीकपात पालिका प्रशासनाने बुधवारी मागे घेतली़ मात्र, सध्याचा पाणीसाठा क्षमतेच्या केवळ ५५ टक्के असल्याने केवळ राजकीय दबावामुळे प्रशासनाने पाणीकपात रद्द करण्याची घाई केल्याचे समजते़महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी असल्याने पाणीकपात लवकरात लवकर रद्द करून घेण्यासाठी शिवसेना व भाजपाच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू होती़ मात्र, सध्या तलावांच्या एकूण १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर क्षमतेपैकी केवळ ७ लाख ९३ हजार ०५१ दशलक्ष लीटर पाणीसाठा असल्याने आणखी महिनाभर तरी वाट पाहण्याची तयारी पालिका प्रशासनाने केली होती़ अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून तसे स्पष्ट केले होते़ गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत यंदा ३३ टक्के जादा पाऊस जुलै महिन्यापर्यंत झाला आहे़ त्यामुळे गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत सध्या ६४ टक्के जादा पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ त्या आधारावर बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांनी अचानक पाणीकपात रद्द करण्यात येत असल्याची घोषणा केली़ तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा झालेला नसताना पाणीकपात रद्द करणे हा उतावीळपणा ठरू शकतो़ प्रशासनाने केवळ राजकीय दबावाला बळी पडत हा निर्णय घेतल्याचे समजते़ (प्रतिनिधी)>व्यावसायिक पाणीकपातही रद्द व्यावसायिक पाणीपुरवठ्यात ५० टक्के कपात करण्यात आली होती़, तर जलतरण तलावांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता़ हा पुरवठाही आता पूर्ववत होईल.पाणीपुरवठा आजपासून पूर्ववत होणार : गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून १५ टक्के पाणीकपात सुरू असल्याने ३,२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे़ ही कपात रद्द झाल्याने मुंबईकरांना आता दररोज पूर्वीप्रमाणेच ३,७५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होणार आहे़ सध्या केवळ १६७ दिवसांचा पाणीसाठा : मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख ३७ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा असणे अपेक्षित आहे़ म्हणजेच ३६५ दिवसांचा साठा हवा आहे़ मात्र आजमितीस १६७ दिवसांचा पाणीसाठा तलावांमध्ये आहे़ पावसाळ््याचे अद्याप दोन महिने आहेत. ते संपण्याआधीच पाणीकपात रद्द करणे हा उतावीळपणा ठरू शकतो़