शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

साडेबारा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली

By admin | Updated: June 12, 2017 03:05 IST

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामातून अडीच वर्षांत साडेबारा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, तब्बल ११ हजार गावे टँकरमुक्त किंवा दुष्काळमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामातून अडीच वर्षांत साडेबारा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आली असून, तब्बल ११ हजार गावे टँकरमुक्त किंवा दुष्काळमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमांतर्गत ते बोलत होते. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे निर्मित ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. ‘पाणी’ विषयावरील या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी निवडक लोकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. ‘जलयुक्त शिवार’ अभियानात लोकसहभागातून ५६० कोटींचा निधी उभा राहीला. तर सरकारने योजनेसाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्च केले. मोठ्या धरणांपेक्षा जलसंधारणाच्या छोट्या कामांना प्राधान्य दिल्याने ‘जलयुक्त शिवार’ यशस्वी ठरल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जलयुक्तच्या माध्यमातून जितकी सिंचन क्षमता निर्माण झाली तितकी सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रकल्पांना साधारण ३० हजार कोटींचा खर्च आला असता, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. पिण्याच्या पाण्यासाठीही ‘जलयुक्त शिवार’ उपयोगी ठरली असून, साधारण ११ हजार गावे टँकरमुक्त व दुष्काळमुक्त करण्यात यश मिळाले आहे. जलयुक्तची गावागावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.तीन वर्षांत ड्रीपवरीलक्षेत्र दुप्पट करणारप्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाने २६ हजार कोटींचा निधी दिला आहे. नाबार्डनेही सूक्ष्म सिंचनासाठी कमी व्याजदरावर कर्ज देण्याचे कबूल केले आहे. तीन वर्षांत ड्रीपवरील क्षेत्र दुप्पट करण्यासाठी योजना आखली आहे. याशिवाय पाच धरण क्षेत्रांतील संपूर्ण ऊस ड्रीपवर आणण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.गोसी खुर्द प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत पूर्ण करणारविदर्भातील गोसी खुर्द प्रकल्प डिसेंबर २०१९पर्यंत पूर्ण केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. गैरव्यवहारात अडकलेली आधीची सगळी कामे निविदा रद्द करण्यात आल्या आहेत. पुनर्वसन जवळपास पूर्णत्वाला नेले आहे. जुन्या पुनर्वसित गावांतील प्रश्न सोडवण्यात आले, असे ते म्हणाले.