शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

विदर्भात वीज कोसळून १५ ठार

By admin | Updated: August 22, 2014 01:32 IST

अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी दुपारनंतर विदर्भात कहर केला. वादळी पावसासह वीज कोसळून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील महिलेसह तीन जण ठार व

१६ गंभीर जखमी : सहा जनावरे दगावलीनागपूर : अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गुरुवारी दुपारनंतर विदर्भात कहर केला. वादळी पावसासह वीज कोसळून यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील महिलेसह तीन जण ठार व तीन जण गंभीर जखमी व पुसद तालुक्यात तीन जण ठार झाले. वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुक्यात यवतमाळ जिल्ह्यातीलच शेतमजूर महिला मरण पावली. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात एक शेतकरी ठार होऊन त्याची पत्नी गंभीर जखमी आणि सावली तालुक्यात सहा जनावरे मृत्युमुखी पडली तर राजुरा तालुक्यात दोन महिला ठार व दोन गंभीर जखमी, बुलडाणा जिल्ह्यातही दोन महिला ठार व चार जण जखमी आणि नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुक्यात तीन ठार आणि सहा जखमी झाले.नागपूर जिल्ह्यात उमरेड तालुक्यात ओमेश्वर भाऊराव अलाम (२४) व विनोद केशव सलाम (२०) दोघेही रा. चनोडा अशी मृत तरुणांची तर, सुजित सुरेश गोटे (१४, रा. चनोडा) असे गंभीर जखमीचे नाव आहे. त्याच्यावर उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही शेतातून घरी परत येत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. करंभाड येथील सुलोचना श्रीराम लांजेवार (६२) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, मीना गणेश सहारे (४५), कांता अर्जुन हटवार (६२), ज्योती वसंत हटवार (४५), चंद्रकला अर्जुन हटवार (३५) सर्व रा. बाभूळवाडा व मनीषा भारत मसरकोल्हे (१७) रा. निंबा या पाच महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना नगापूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील घटनेत गजानन रामचंद्र जाधव (२४), संतोष राघो दातकर (३०) रा. करंजखेड आणि रेखा विलास शिंदे (४०) रा. काळीटेंभी ता. महागाव, व पुसद तालुक्यात वत्सलाबाई संभाजी शेळके (४०) रा. धनज, किशोर रामप्रसाद राठोड (१८) रा. माळआसोली, तुकाराम सखाराम पवार (५५) रा. माणिकडोह अशी मृतांची नावे आहे. तर मारोती तुकाराम जाधव (४५), बाबाराव कानबा बोरकर (४५) रा. करंजखेड आणि सुमन दिगंबर वानखेडे रा.काळी टेंभी, माधवराव पंडागळे (६०) पांढुर्णा केदारलिंग ता. पुसद अशी जखमींची नावे आहे. करंजखेड येथील दत्तराव भांगे यांच्या शेतात मजूर गुरुवारी दुपारी काम करीत होते. अचानक पावसाला प्रारंभ झाल्याने आश्रय घेतलेल्या झाडावर वीज कोसळून गजानन व संतोष जागीच ठार झाले. जखमी मारोती व बाबारावला सवनाच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच काळीटेंभी येथे रेखा शिंदे आणि सुमन वानखेडे या एका शेतात काम करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यात रेखा जागीच ठार झाली. उमरखेड तालुक्यातील धनज शिवारातील शेतात वीज कोसळून वत्सलाबाई शेळके गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उमरखेडच्या रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर पुसद तालुक्यातील माळआसोली येथे किशोर राठोड आणि माणिकडोह येथे तुकाराम पवार वीज कोसळून ठार झाले. हे दोघेही आपल्या शेतात आज दुपारी काम करीत होते. विजेमुळे दोन दिवसात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या आता दहा झाली आहे.वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात शेतात काम करीत असलेली सुनीता देवराव गायकवाड रा.दहेगाव, ता. राळेगाव, जि.यवतमाळ ही महिला ठार झाली. ती दशरथ ठाकरे यांच्या शेतात निंदणाचे काम करीत होती. दरम्यान दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. यावेळी वीज पडली. घटनेची माहिती बाबाराव सायंकार यांनी हिंगणघाट पोलिसांनी दिली.चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील चार्ली शेतशिवारात गुरुवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास अचानक वीज कोसळली. ही वीज शेतात काम करीत असलेल्या सरस्वती खवसे (६०), कवडू खवसे (४२) व माधुरी खवसे (३७) यांच्या अंगावर पडली. त्यात सरस्वती खवसे या महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर कवडू व माधुरी गंभीर जखमी झालेत. या दोघांवर राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचवेळी तालुक्यातील जैतापूर शेतशिवारातही वीज पडूच शेतात काम करीत असलेली वंदना तोडासे (३८) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. वरोरा तालुक्यातील नागरी (रेल्वे) येथे मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास शेतात वीज पडून विलास भाऊराव बुरेले (३२) या युवा शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तर त्याची पत्नी रंजना बुरेले (२६) ही गंभीर जखमी झाली. तसेच बाजुला असलेला एक बैल जागीच ठार झाला. सावली तालुक्यातील डोनाळा शेतशिवारात मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास वीज कोसळली. या दुर्घटनेत भास्कर शेंडे यांची एक गाय, पुरूषोत्तम बोजलवार यांची एक गाय, किशोर सोनटक्के यांचा गोऱ्हा व खुशाल भोयर यांची एक गाय अशी चार जनावरे अंगावर वीज पडून मृत्युमुखी पडली. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उकळी व हिवरा साबळे शिवारात गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास अनेक गावात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. उकळी शिवारात मोहन बोरे यांच्या शेतात पावसापासून संरक्षण होण्यासाठी महिला निंबाच्या झाडाखाली गेल्या. मात्र झाडावर वीज पडल्याने उकळी येथील सोनु शिवाजी अवदगे (२०) या महिलेचा मृत्यू झाला. तसेच सुरेखा रामप्रसाद खोडवे ही गंभीर जखमी झाली आहे. तसेच याच शिवारात स्वत:च्या शेतात काम करीत असताना वीज पडून सुमित्रा अर्जुन बोरे (५५) ही गंभीर जखमी झाली. तिला तात्काळ मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तालुक्यातील हिवरा साबळे येथेही वीज पडून ज्ञानेश्वर सखाराम गायकवाड (२५), प्रदुप सुभाष वाघ (२५) व सुवर्णा ज्ञानेश्वर गायवाकड हे तिघे गंभीर जखमी झाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)