शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

मुंबई-गुजरात महामार्गावरील वरसावे पूल दुरुस्तीसाठी १५ दिवस बंद

By admin | Updated: September 3, 2016 20:14 IST

१९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे

- राजू काळे / ऑनलाइन लोकमत
भाईंदर, दि. 3 - केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत १९९५ मध्ये बांधलेल्या मुंबई-गुजरात महामार्ग क्रमांक ८ दरम्यान असलेल्या उल्हासनदीवरील उड्डाणपुल दुरुस्तीच्या कारणास्तव १५ दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हि दुरुस्ती गणेशोत्सवानंतर सुरु होणार असल्याने मुंबईकडे येणारी वाहतूक जुन्या पुलावरून तसेच चिंचोटी मार्गे वळविण्यात येणार आहे. 
 
महाडमधील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेनंतर केंद्र व राज्य सरकारने बांधलेल्या वाहतूक पुलांच्या  स्ट्रक्टरल ऑडिटला सुरुवात झाली. तत्पूर्वी डिसेंबर २०१३ मध्ये १९९५ मध्ये बांधण्यात आलेल्या वारसावे पुलालगत असलेल्या ४३ वर्षे जुन्या पुलाच्या गर्डरला तडा गेल्याने हा पूल तब्बल दिड वर्षे बंद ठेवण्यात आला होता. यामुळे घोडबंदर व गुजरात महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. येथील वाहतूक कोंडीचे नियोजन  करण्यासाठी २४  तास वाहतूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. यावेळी गुजरातकडे जाणारी अवजड वाहतूक ठाणेमार्गे भिवंडी येथून वळविण्यात आली तर हलकी वाहने लगतच्या पुलावरून सोडण्यात आली. सध्या या पुलाची तपासणी शुक्रवारपासून सुरु करण्यात आली आहे. तर नवीन  पुलाच्या दुरुस्तीचे काम  हाती घेण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. 
सध्या गणेशोत्सवाचा सण सुरु होणार असल्याने दुरुस्तीला  गणेशोत्सवानंतर सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे १५ दिवस पुलाच्या  दुरुस्तीसाठी देण्यात आले असून ती आयआरबीमार्फत  होणार आहे. दुरुस्तीच्या कामामुळे गुजरातहून मुंबईकडे येणारी वाहतूक वसईच्या चिंचोटीमार्गे भिवंडीकडे वळविण्यात येणार असून त्यात अवजड वाहतुकीचा समावेश आहे.  हलकी वाहने  लगतच्या जुन्या पुलावरून सोडण्यात येणार आहेत. यामुळे मुंबईहून गुजरात व वसई-विरारकडे जाणाऱ्या तसेच  वसई-विरारमार्गे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीची प्रचंड कोंडी होणार आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे  प्रभारी व्यवस्थापक  दिनेश अग्रवाल म्हणाले, सध्या घडणाऱ्या दुर्घटनांमुळे  प्रसंगावधान राखूनच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत कदम म्हणाले, पुलाच्या दुरुस्तीदरम्यान होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीच्या नियोजनासाठी मुंबई, पालघर, ठाणे शहर व ग्रामीण वाहतूक शाखांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. दुरुस्तीला इवलम्ब होण्याची शक्यता गृहीत धरता त्यादरम्यान  चालकांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा. 
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या पत्रानुसार सुरुवातीला जुना पुल वाहतुकीसाठी त्वरीत बंद करून त्याच्या दुरूस्तीला सुरुवात करण्याबाबत कळविण्यात आले असल्याचं ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर बोलले आहेत.
गणेशोत्सवाच्या काळात पुलाकडील वाहतुकीच्या नियोजनासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. परंतु, मागील घटना पाहता जुन्या पुलाची दुरुस्ती आवश्यक बनल्याने संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांना नाईलाजास्तव धावपळ करावी लागणार आहे.