शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

आदिवासींसाठीच्या डिझेल इंजीन खरेदी प्रकरणी १५ कोटींचा घोटाळा

By admin | Updated: May 9, 2017 02:42 IST

आदिवासींसाठी डिझेल इंजीन खरेदी प्रकरणी दहा प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयांनी ७७५८ डिझेल इंजिनांचे वाटप लाभार्थ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आदिवासींसाठी डिझेल इंजीन खरेदी प्रकरणी दहा प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयांनी ७७५८ डिझेल इंजिनांचे वाटप लाभार्थ्यांना न करता त्याची बेकायदा विल्हेवाट लावल्याने सरकारला १४ कोटी ८९ लाख ५३ हजार ६०० कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागला आहे, अशी माहिती उच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय समितीने उच्च न्यायालायत सादर केलेल्या अहवालतून उघडकीस आली आहे. आदिवासी योजनांमध्ये झालेल्या घोटाळ्यासंबंधी नाशिकचे बहिराम मोतीराम यांनी अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी व अ‍ॅड. रत्नेश दुबे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेच्या सुनावणीत राज्य सरकारने या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली.या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार, दहा जिल्ह्यांतील प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयांनी (आरएमओ) ३५०७७ लाभार्थ्यांना डिझेल इंजिनांचे वाटप करायचे होते. परंतु, त्यांनी २७३१९ लाभार्थ्यांनाच डिझेल इंजिनांचे वाटप केले. उर्वरित ७७५८ डिझेल इंजिनांची बेकायदा विल्हेवाट लावली. अशा प्रकारे दहा आरएमओंनी १४ कोटी ८९ लाख ५३ हजार ६०० कोटींचा अपहार केला. अधिकार नसतानाही डिझेल इंजीन खरेदीचा आदेशडिझेल इंजीन खरेदीसंदर्भात ३० डिसेंबर २००४ रोजी तत्कालीन आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत डिझेल इंजीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया हाती घेण्यात आली. त्यासंदर्भातील अधिकार ठराव मंजूर न करताच तत्कालीन व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले. संचालक मंडळाऐवजी कार्यकारी समितीने त्यांना हा अधिकार दिला. कायद्याने त्यांना हा अधिकार नाही , असे अहवालात म्हटले आहे.‘आकाशदीप’ला झुकते मापडिझेल इंजीन बसवण्याचे व वाटपाचे काम सोपवण्यात आलेल्या आकाशदीप कंत्राटदाराला कार्यकारी समितीकडून झुकते माप देण्यात आल्याचेही अहवालावरून स्पष्ट होते. इंजीन खरेदी केल्यानंतर त्याचे वाटप करण्यासंदर्भात कंत्राट देण्याबाबत संचालक मंडळाने ठराव मंजूर केला नसतानाही कार्यकारी समितीने आकाशदीप कंत्राटदाराला काम दिले. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अनामत रक्कम घेण्यात आली नाही. या कंपनीचे सर्वेसर्वा गिरीश परदेशी हे गावितांचे अत्यंत जवळचे आहेत. या कामासाठी कंत्राटदाराला ८ कोटी ३१ लाख ९५ हजार ८४७ रुपये देण्यात आले. त्याला एवढ्या रकमेत ३२,८३१ इंजिनांचे वाटप करून बसवायचे होते. मात्र प्रत्यक्षात त्याने २७,३१९ इंजिनांचे वाटप करून बसवले. त्यामुळे ७७५८ इंजिनांचे वाटप आणि बसवण्याचे शुल्क आकारण्याचा अधिकार नसतानाही त्याला त्यासाठी अतिरिक्त १ कोटी ९५ लाख ८८ हजार ९५० रुपये देण्यात आले. त्यामुळे गायकवाड समितीन नंदुरबार येथील आकाशदीप विद्युत कामगार सहकारी संस्थेकडून अतिरिक्त रक्कम वसूल करण्याची शिफारस केली आहे. (प्रतिनिधी)