शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

१४५ सिंचन प्रकल्प गुंडाळणार?

By admin | Updated: December 8, 2014 02:37 IST

२५ टक्केही निधी आतापर्यंत खर्च होऊ शकलेला नाही असे पांढरा हत्ती बनलेले ३० हजार २४१ कोटी रुपयांचे १४५ सिंचन प्रकल्प थंडबस्त्यात टाकण्याची तयारी राज्याच्या जलसंपदा विभागाने चालविली आहे.

यदु जोशी, नागपूरज्या प्रकल्पांवर २५ टक्केही निधी आतापर्यंत खर्च होऊ शकलेला नाही असे पांढरा हत्ती बनलेले ३० हजार २४१ कोटी रुपयांचे १४५ सिंचन प्रकल्प थंडबस्त्यात टाकण्याची तयारी राज्याच्या जलसंपदा विभागाने चालविली आहे. ७५ टक्क्यांपेक्षा जास्त निधी खर्च झालेले प्रकल्प प्राधान्यक्रमाने पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. ७५ टक्क्यांहून अधिक कामे झालेले ९० सिंचन प्रकल्प असून, त्यावर ३ हजार २६६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यातून २ लाख ४१ हजार हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण होईल. त्यासाठी तातडीने निधी देण्याचे धोरण असेल, असे महाजन यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी ५० ते ७५ टक्के निधी खर्च झालेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. वार्षिक आठ हजार कोटी रुपयांची तरतूद असलेल्या जलसंपदा विभागाकडे त्यातून २५ टक्के निधी खर्च झालेल्या प्रकल्पांना देण्यासाठी रक्कम जवळपास नसेल. त्यामुळे या प्रकल्पांबाबत एकतर गो स्लो धोरण अवलंबायचे किंवा ते थंडबस्त्यात टाकायचे, असे पर्याय सरकारपुढे असतील. २५ टक्क्यांपर्यंतच निधी खर्च झालेले प्रकल्प पूर्ण करायचे तर त्याला अनेक वर्षे लागतील. आधीच्या सरकारने अवलंबिलेले वेळकाढूपणाचे आणि खर्चिक धोरण अवलंबिण्यापेक्षा पूर्णत्वाकडे असलेल्या प्रकल्पांची पूर्तता हे नव्या सरकारचे लक्ष्य असेल.