शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक

By admin | Updated: June 12, 2014 01:13 IST

माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी १९९६ ते ३१ आॅगस्ट २०११ पर्यंत नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहात होते, असे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे

बँकेत बचत खाते : मालमत्ताही खरेदी केलीनागपूर : माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी १९९६ ते ३१ आॅगस्ट २०११ पर्यंत नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहात होते, असे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यापैकी २५ पाकिस्तानी नागरिकांची जरीपटका येथील साधना सहकारी बँकेत बचत खाती आहेत. तसेच अनेकांनी ठिकठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. असंख्य पाकिस्तानी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात अवैधपणे वास्तव्यास असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते एजाज खान नूर खान व अन्य सहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. उपरोक्त माहिती याचिकाकर्त्यांनी मिळविली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिकांना विशिष्ट मुदतीसाठी व वर्तणूक चांगली ठेवण्याच्या अटीवर भारतात राहण्याची परवानगी दिली जाते. तत्पूर्वी सर्व प्रकारची चौकशी केली जाते. दीर्घ मुदतीचा व्हिसा नाकारल्यानंतर संबंधित पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडून जावे, अशी सूचना पोलीस अधीक्षक /पोलीस उपायुक्त यांना केली जाते. परंतु, संबंधित नागरिक भारत सोडून जात नाहीत व त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जात नसल्याचे आढळून आले आहे. काही पाकिस्तानी नागरिक वर्षाकाठी दहा-बारा वेळा भारतात येत असल्याची उदाहरणे आहेत. कायद्यानुसार एका पाकिस्तानी नागरिकांला एका वर्षामध्ये केवळ एकदाच भारतात प्रवेश करता येतो. काही पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या नावाने पाच-सहा पासपोर्ट तयार करून भारतात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी नागरिक लपून राहिले तर हेरगिरी होण्याचा धोका आहे, असे गुप्तवार्ता विभागाच्या एका पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय गृह विभागाचे अवर सचिव (विदेशी नागरिक) विकास श्रीवास्तव यांनी यापूर्वी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोवा येथे तब्बल ४८२ विदेशी नागरिकांनी अनधिकृतरित्या जमीन खरेदी केली आहे. व्हिसाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर २०१०, २०११ व २०१२ या तीन वर्षात भारतातून २२ हजार ५९१ अवैध विदेशी नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून त्यात १०४ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. याचिकाकर्ते यावर प्रत्युत्तर सादर करणार आहेत. त्यासाठी, आज, बुधवारी याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी न्यायालयाला दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला.(प्रतिनिधी)