शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक

By admin | Updated: June 12, 2014 01:13 IST

माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी १९९६ ते ३१ आॅगस्ट २०११ पर्यंत नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहात होते, असे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे

बँकेत बचत खाते : मालमत्ताही खरेदी केलीनागपूर : माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार १ जानेवारी १९९६ ते ३१ आॅगस्ट २०११ पर्यंत नागपुरात १४३७ पाकिस्तानी सिंधी नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर राहात होते, असे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. यापैकी २५ पाकिस्तानी नागरिकांची जरीपटका येथील साधना सहकारी बँकेत बचत खाती आहेत. तसेच अनेकांनी ठिकठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे. असंख्य पाकिस्तानी नागरिक व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात अवैधपणे वास्तव्यास असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते एजाज खान नूर खान व अन्य सहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. उपरोक्त माहिती याचिकाकर्त्यांनी मिळविली आहे. गुप्तवार्ता विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिकांना विशिष्ट मुदतीसाठी व वर्तणूक चांगली ठेवण्याच्या अटीवर भारतात राहण्याची परवानगी दिली जाते. तत्पूर्वी सर्व प्रकारची चौकशी केली जाते. दीर्घ मुदतीचा व्हिसा नाकारल्यानंतर संबंधित पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडून जावे, अशी सूचना पोलीस अधीक्षक /पोलीस उपायुक्त यांना केली जाते. परंतु, संबंधित नागरिक भारत सोडून जात नाहीत व त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जात नसल्याचे आढळून आले आहे. काही पाकिस्तानी नागरिक वर्षाकाठी दहा-बारा वेळा भारतात येत असल्याची उदाहरणे आहेत. कायद्यानुसार एका पाकिस्तानी नागरिकांला एका वर्षामध्ये केवळ एकदाच भारतात प्रवेश करता येतो. काही पाकिस्तानी नागरिक वेगवेगळ्या नावाने पाच-सहा पासपोर्ट तयार करून भारतात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाकिस्तानी नागरिक लपून राहिले तर हेरगिरी होण्याचा धोका आहे, असे गुप्तवार्ता विभागाच्या एका पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.केंद्रीय गृह विभागाचे अवर सचिव (विदेशी नागरिक) विकास श्रीवास्तव यांनी यापूर्वी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ गोवा येथे तब्बल ४८२ विदेशी नागरिकांनी अनधिकृतरित्या जमीन खरेदी केली आहे. व्हिसाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यानंतर २०१०, २०११ व २०१२ या तीन वर्षात भारतातून २२ हजार ५९१ अवैध विदेशी नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून त्यात १०४ पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. याचिकाकर्ते यावर प्रत्युत्तर सादर करणार आहेत. त्यासाठी, आज, बुधवारी याचिकाकर्त्यांचे वकील अ‍ॅड. श्रीकांत खंडाळकर यांनी न्यायालयाला दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला.(प्रतिनिधी)