शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटीतून मिळालेले १४०० संगणक अडगळीत

By admin | Updated: September 1, 2016 17:51 IST

संगणकाव्दारे त्यांना शालेय अभ्यासक्रमांचे विषय शिकविणे, यासाठी केंद्रपुरस्कृत आयसीटी (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना) सन २००७-०८ पासून राबविण्यात येत आहे.

सुनील काकडे, 

वाशिम, दि. 1 - माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देणे, संगणकाद्वारे त्यांना शालेय अभ्यासक्रमांचे विषय शिकविणे, यासाठी केंद्रपुरस्कृत आयसीटी (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना) सन २००७-०८ पासून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत तीन टप्प्यात जिल्ह्याला तब्बल १४०० संगणक मिळाले. मात्र, तज्ज्ञ प्रशिक्षक तथा आवश्यक सुविधांअभावी यातील बहुतांश संगणक आजमितीस अडगळीत पडून असल्याची बाब लोकमतच्या पाहणीत उघड झाली.

केंद्र शासनाने ४ नोव्हेंबर २००८ रोजी घेतलेल्या प्रकल्प नियंत्रण आणि मुल्यमापन गटाच्या बैठकीत संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये आयसीटी योजना राबविण्यास मान्यता दर्शविली. या योजनेची अंमलबजावणी बीओओटी तत्वावर (बिल्ड ओन आॅपरेट अ‍ॅण्ड ट्रान्सफर) करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, जिल्ह्यात तीन टप्प्यात १४० शाळांमध्ये संगणक लॅब उभारण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६ शाळांना प्रती शाळा १० संगणक संच आणि प्रत्येकी १ आॅपरेटर, इलेक्ट्रीक देयक यासह तत्सम सुविधा पुरविण्यात आल्या. त्यात रिसोड तालुक्यात रिसोड, रिठद, मोप येथील श्री शिवाजी विद्यालय, कवठा चिखली येथील पंडित नेहरू विद्यालय, मानोरा तालुक्यातील मानोरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय, शेंदूरजना येथील आप्पास्वामी विद्यालय, कडोळी येथील बाबनाजी महाराज विद्यालय, वाईगौळ येथील तपस्वी काशीनाथ बाबा हायस्कुल आश्रमशाळा, धामणी येथील एलएसपीएम विद्यालय, मालेगांव तालुक्यातील मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय, जऊळका रेल्वे, किन्हीराजा येथील श्री शिवाजी विद्यालय, शिरपूर येथील कोंडबातात्या ढवळे विद्यालय, मुंगळा येथील मोरेश्वर विद्यालय आणि खंडाळा येथील समाज प्रबोधन विद्यालयाचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ५६ शाळा या योजनेसाठी पात्र ठरल्या; तर तिसऱ्या टप्प्यात तब्बल ६७ शाळांमध्ये आयसीटी योजनेतून संगणक लॅब उभारण्यात आली. असे असले तरी १४० शाळांपैकी बहुतांश शाळांमधील संगणक लॅब चक्क बंद असून तज्ज्ञ प्रशिक्षक, विद्यूतची सोय नसणे, इमारतींची दुरवस्था आदी कारणांमुळे अनेक ठिकाणचे आजही धूळखात पडून आहेत. परिणामी, शासनाचा मूळ उद्देश असफल झाला असून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी या महत्प्रयासानंतरही संगणकीय शिक्षणात माघारला आहे.