शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटीतून मिळालेले १४०० संगणक अडगळीत

By admin | Updated: September 1, 2016 17:51 IST

संगणकाव्दारे त्यांना शालेय अभ्यासक्रमांचे विषय शिकविणे, यासाठी केंद्रपुरस्कृत आयसीटी (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना) सन २००७-०८ पासून राबविण्यात येत आहे.

सुनील काकडे, 

वाशिम, दि. 1 - माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान देणे, संगणकाद्वारे त्यांना शालेय अभ्यासक्रमांचे विषय शिकविणे, यासाठी केंद्रपुरस्कृत आयसीटी (माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान योजना) सन २००७-०८ पासून राबविण्यात येत आहे. याअंतर्गत तीन टप्प्यात जिल्ह्याला तब्बल १४०० संगणक मिळाले. मात्र, तज्ज्ञ प्रशिक्षक तथा आवश्यक सुविधांअभावी यातील बहुतांश संगणक आजमितीस अडगळीत पडून असल्याची बाब लोकमतच्या पाहणीत उघड झाली.

केंद्र शासनाने ४ नोव्हेंबर २००८ रोजी घेतलेल्या प्रकल्प नियंत्रण आणि मुल्यमापन गटाच्या बैठकीत संपूर्ण राज्यातील शाळांमध्ये आयसीटी योजना राबविण्यास मान्यता दर्शविली. या योजनेची अंमलबजावणी बीओओटी तत्वावर (बिल्ड ओन आॅपरेट अ‍ॅण्ड ट्रान्सफर) करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार, जिल्ह्यात तीन टप्प्यात १४० शाळांमध्ये संगणक लॅब उभारण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६ शाळांना प्रती शाळा १० संगणक संच आणि प्रत्येकी १ आॅपरेटर, इलेक्ट्रीक देयक यासह तत्सम सुविधा पुरविण्यात आल्या. त्यात रिसोड तालुक्यात रिसोड, रिठद, मोप येथील श्री शिवाजी विद्यालय, कवठा चिखली येथील पंडित नेहरू विद्यालय, मानोरा तालुक्यातील मानोरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्यालय, शेंदूरजना येथील आप्पास्वामी विद्यालय, कडोळी येथील बाबनाजी महाराज विद्यालय, वाईगौळ येथील तपस्वी काशीनाथ बाबा हायस्कुल आश्रमशाळा, धामणी येथील एलएसपीएम विद्यालय, मालेगांव तालुक्यातील मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय, जऊळका रेल्वे, किन्हीराजा येथील श्री शिवाजी विद्यालय, शिरपूर येथील कोंडबातात्या ढवळे विद्यालय, मुंगळा येथील मोरेश्वर विद्यालय आणि खंडाळा येथील समाज प्रबोधन विद्यालयाचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ५६ शाळा या योजनेसाठी पात्र ठरल्या; तर तिसऱ्या टप्प्यात तब्बल ६७ शाळांमध्ये आयसीटी योजनेतून संगणक लॅब उभारण्यात आली. असे असले तरी १४० शाळांपैकी बहुतांश शाळांमधील संगणक लॅब चक्क बंद असून तज्ज्ञ प्रशिक्षक, विद्यूतची सोय नसणे, इमारतींची दुरवस्था आदी कारणांमुळे अनेक ठिकाणचे आजही धूळखात पडून आहेत. परिणामी, शासनाचा मूळ उद्देश असफल झाला असून ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी या महत्प्रयासानंतरही संगणकीय शिक्षणात माघारला आहे.