शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या तिजोरीवर १४ हजार कोटींचा बोजा

By admin | Updated: May 9, 2017 02:40 IST

जकातीमधून महापालिका, नगरपालिकांना मिळणारे उत्पन्न जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारला द्यावे लागणार

अतुल कुलकर्णी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जकातीमधून महापालिका, नगरपालिकांना मिळणारे उत्पन्न जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारला द्यावे लागणार असून त्यापोटी सरकारच्या तिजोरीवर १४ हजार कोटींचा बोजा पडणार आहे. मुंबई महापालिकेला ७ हजार कोटी रुपये मिळतील, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.वित्तमंत्री मुनगंटीवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली व या विषयावर चर्चा केली. भेटीनंतर मुगनंटीवार यांनी सांगितले की, मुंबई महापालिकेला जकातीमधून २०१६-१७ मध्ये सुमारे ७३०० कोटी रुपये मिळाले होते. आम्हाला मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी काय? असा ठाकरे यांचा प्रश्न होता. त्यावर आम्ही यासाठी राज्यात कायदा आणत असल्याचे सांगितले. मात्र महापालिकांना किती व कसे पैसे दिले जाणार हे येणाऱ्या कायद्यात स्पष्ट करा, अशी मागणी ठाकरे यांनी केली. त्यानुसार कायद्याचा मसुदा सोमवारी रात्री उशिरा ठाकरे यांना पाठवण्यात आला. या मसुद्याच्या अनुषंगाने आपण मंगळवारी पुन्हा सकाळी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.मुंबई महापालिकेच्या जकातीच्या उत्पन्नात दरवर्षी ४ टक्क्यांनी वाढ होत आहे. पण राज्य् ासरकारने मिळणाऱ्या एकूण उत्पन्नाच्या ८ टक्के वाढ दरवर्षी देण्याचे मान्य केले आहे. ही वाढ मूळ उत्पन्नावर असेल. यावर्षीचे उत्पन्न जर ७३०० कोटी असेल तर त्यावर ४ टक्के वाढ त्यांना मिळेल. राज्यातील अन्य महापालिका व नगरपालिकांसाठी ६ ते साडेसहा हजार कोटी रुपये दरवर्षी राज्य सरकारला द्यावे लागतील.सरकारला शिवसेनेच्या पाठींब्याविषयी साशंकता आहे का, असे विचारले असता असता मुनगंटीवार म्हणाले, ठाकरे हे सरकारमधील घटक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यामुळे त्यांना भेटण्यात गैर नाही. शिवाय, जकातीशी संबंधित जे जे लाभधारक असतील, त्या सगळ्यांना आपण कायद्याचा मसुदा उद्या दाखवणार आहोत. त्यासाठी उद्या विविध आमदारांची बैठकही ठेवण्यात आली आहे.दरम्यान, ‘जीएसटी’ संदर्भात अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेणार असतील तर सरकारने विधिमंडळाचे विशेष अधिवेशन कशासाठी बोलावले? असा संतप्त सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.