शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

14 जिल्हे अपर अधीक्षकाविना

By admin | Updated: August 20, 2014 02:31 IST

वाढत्या गुन्ह्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना त्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजना करण्यामध्ये गृह विभागाने कानाडोळा केला आहे.

जमीर काझी - मुंबई
वाढत्या गुन्ह्यांमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना त्यासाठीच्या तातडीच्या उपाययोजना करण्यामध्ये गृह विभागाने कानाडोळा केला आहे. जिल्हा पोलीस प्रमुखानंतर दुय्यम दर्जाचा अधिकार असलेल्या अप्पर अधीक्षकांची 14 जिल्ह्यांतील तब्बल 54 पदे  तर शहर, तालुका व विभागाचे पर्यवेक्षक (सुपरव्हिजन) अधिकारी असलेल्या सहायक आयुक्त/ उपअधीक्षकांची तब्बल 3क्क् पदे रिक्त आहेत. 
आयपीएस अधिकारी व प्रत्यक्ष तपास काम, बंदोबस्त करणा:या पोलिसांतील दुवा म्हणून काम करीत असलेली ही पदे तातडीने भरण्यासाठी पोलीस मुख्यालयाने 4 महिन्यांपूर्वी पदोन्नतीचा प्रस्ताव पाठवला आहे. मात्र गृह व सामान्य प्रशासन (जेडीए) विभागामध्ये ही फाईल रेंगाळली आहे. आठवडय़ाभरात आचारसंहिता जाहीर होणार असल्याने त्याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पोलिसांना अपु:या अधिका:यांसह निवडणुकीच्या बंदोबस्ताला सामोरे जावे लागणार आहे.
दोन लाखांवर फौजफाटा असलेल्या राज्य पोलीस दलामध्ये आयपीएस दर्जाच्या केडरपदासह उपायुक्त/ अक्षीक्षक/ अप्पर अधीक्षकांची एकूण 282 पदे मंजूर असून, त्यापैकी 54 जागा रिक्त आहेत. पोलीस विभागांतर्गत विविध आयुक्तालय/ जिल्हा व विविध शाखेतील पदोन्नतीने ही पदे भरायची आहेत. एमपीएससीद्वारे थेट सहायक आयुक्त/ उपअधीक्षक म्हणून भरती झालेल्या अधिका:यांना सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारावर बढती देऊन ही पदे भरावयाची आहेत.
अपर अधीक्षकाप्रमाणोच राज्यातील सहायक आयुक्त/ उपअधीक्षकांची 3क्क् पदे रिक्त आहेत. त्यापैकी 13क् जागा या प्रत्यक्षात कायदा व सुव्यवस्थेचा थेट संबंध असलेल्या विभागातील आहेत. या दर्जाची एकूण 681 पदे मंजूर असून, मे महिन्यार्पयत 435 पदे रिक्त होती. दीड महिन्यापूर्वी 98 वरिष्ठ निरीक्षकांना उपअधीक्षक म्हणून बढती दिल्याने अद्याप 3क्7 रिक्त पदे आहेत. त्यामुळे 115 पोलीस निरीक्षकांना बढत्या देण्याचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्याबाबत अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. 
 
च्पोलीस मुख्यालयाकडून त्याबाबतचा प्राथमिक प्रस्ताव आल्यानंतर गृह विभाग पदाच्या मान्यतेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवितो. त्यांच्या मंजुरीनंतर गृह विभागाकडून पुन्हा हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठविला जातो.  
च् एप्रिलमध्ये पोलीस महासंचालकांनी हा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविला आहे. तेथून तो सामान्य प्रशासन विभागाकडे सादर केला असून, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. 4 महिन्यांपासून फाईल धूळ खात पडून असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिका:याने सांगितले.