शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
3
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
4
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
5
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
6
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
7
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
8
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
9
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
10
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
11
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
12
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
13
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
14
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
15
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
16
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
17
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
18
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
19
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
20
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’

जिल्ह्यातील १३४ शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2015 02:23 IST

शाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, शाळांचे डिजिटलायझेशन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या संदर्भात एकीकडे शासन प्रयत्न करीत

अजित मांडके,  ठाणेशाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, शाळांचे डिजिटलायझेशन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या संदर्भात एकीकडे शासन प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर या आदिवासी तालुक्यातील १३४ शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्याने खंडित केला असून गेली अनेक महिने या शाळांमधील हजारो विद्यार्थी अंधारातच शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ३४१ शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी अजून संगणकाचे तोंडही पाहिले नसल्याचे उघड झाले आहे. आदिवासी तालुका असलेल्या शहापूर तालुक्यामध्ये गोरगरीब आदिवासी व कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुमारे ४८६ प्राथमिक शाळा सध्या सुरू आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व शाळा डिजीटल शाळा करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. परंतु, शाळांमध्ये संगणकच न पोहचल्याने शिक्षण विभागाकडून व जिल्हा प्रशासनाकडून पालकांची दिशाभूल व गोरगरीब मुलांना संगणक शिक्षणापासून वर्षानुवर्षानुवर्षे वंचित ठेवले आहे. ४८६ पैकी फक्त १२७ शाळांमध्ये संगणक शिकण्याची सोय असून ३४१ शाळांमध्ये अद्याप एकही संगणक पोहचलेला नाही, तर संगणक मिळालेल्या शाळांमध्ये वीजपुरवठा वीज बिल न भरल्याने महावितरणे खंडित केला आहे. अनेक शाळा संगणकाशिवाय, लाईट व पंख्यांशिवाय सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अंधारातच अभ्यास करावा लागत आहे. शाळेचे विजेचे बिल भरण्यासाठी शिक्षण विभागाने व जिल्हा प्रशासनाने आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे १३४ शाळा अंधारात आहेत. याला शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन जबाबदार असून हीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सुद्धा आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षणाबद्दल सातत्याने गळा काढणाऱ्या शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षण हक्क विधेयकाचे उल्लंघन असून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार रामनाथ मोते हे मुंबई उच्च न्यायालयात लवकरच जनिहत याचिका दाखल करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.