शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
6
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
7
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
8
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
9
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
10
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
11
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
12
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
13
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
14
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
15
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
16
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
17
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
18
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
19
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
20
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...

जिल्ह्यातील १३४ शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2015 02:23 IST

शाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, शाळांचे डिजिटलायझेशन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या संदर्भात एकीकडे शासन प्रयत्न करीत

अजित मांडके,  ठाणेशाळांची व विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ, शाळांचे डिजिटलायझेशन करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या संदर्भात एकीकडे शासन प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळे ठाणे जिल्ह्यातील शहापूर या आदिवासी तालुक्यातील १३४ शाळांचा वीजपुरवठा बिल न भरल्याने खंडित केला असून गेली अनेक महिने या शाळांमधील हजारो विद्यार्थी अंधारातच शिक्षण घेत आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या ३४१ शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांनी अजून संगणकाचे तोंडही पाहिले नसल्याचे उघड झाले आहे. आदिवासी तालुका असलेल्या शहापूर तालुक्यामध्ये गोरगरीब आदिवासी व कष्टकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी सुमारे ४८६ प्राथमिक शाळा सध्या सुरू आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्व शाळा डिजीटल शाळा करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. परंतु, शाळांमध्ये संगणकच न पोहचल्याने शिक्षण विभागाकडून व जिल्हा प्रशासनाकडून पालकांची दिशाभूल व गोरगरीब मुलांना संगणक शिक्षणापासून वर्षानुवर्षानुवर्षे वंचित ठेवले आहे. ४८६ पैकी फक्त १२७ शाळांमध्ये संगणक शिकण्याची सोय असून ३४१ शाळांमध्ये अद्याप एकही संगणक पोहचलेला नाही, तर संगणक मिळालेल्या शाळांमध्ये वीजपुरवठा वीज बिल न भरल्याने महावितरणे खंडित केला आहे. अनेक शाळा संगणकाशिवाय, लाईट व पंख्यांशिवाय सुरु आहेत. विद्यार्थ्यांना अंधारातच अभ्यास करावा लागत आहे. शाळेचे विजेचे बिल भरण्यासाठी शिक्षण विभागाने व जिल्हा प्रशासनाने आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे १३४ शाळा अंधारात आहेत. याला शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासन जबाबदार असून हीच परिस्थिती ठाणे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये सुद्धा आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षणाबद्दल सातत्याने गळा काढणाऱ्या शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनाने विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्याची आवश्यकता आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षण हक्क विधेयकाचे उल्लंघन असून संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आमदार रामनाथ मोते हे मुंबई उच्च न्यायालयात लवकरच जनिहत याचिका दाखल करणार असल्याचे शिक्षक परिषदेचे मुंबई उत्तर विभागाचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी सांगितले.