शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
8
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
9
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
10
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
11
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
12
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
13
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
14
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
15
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
16
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
17
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
18
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
19
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
20
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय

कुरघोडीच्या राजकारणामुळे १३२ कोटींचे प्रस्ताव रखडले

By admin | Updated: August 26, 2016 01:59 IST

आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे.

नवी मुंबई : आयुक्त व लोकप्रतिनिधींमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. यामुळे तीन सभांमध्ये महिन्यापासून सर्वसाधारण सभेत एकही प्रस्ताव मंजूर होवू शकलेला नाही. तब्बल १३२ कोटी रुपयांचे प्रस्ताव प्रलंबित असून त्यामध्ये स्मार्ट सिटी, मालमत्ता सर्वेक्षण,औषध खरेदीचाही समावेश आहे. शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत तरी विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या जुलै व आॅगस्ट महिन्याच्या सर्वसाधारण सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्वच विषय मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. २० जुलैला झालेली सभा तहकूब करण्यात आली. यानंतर १६ आॅगस्ट व त्यानंतर झालेल्या दोन तहकूब सभेमध्ये फक्त लक्षवेधीवर चर्चा करून सभा संपविण्यात आली. दोन महिन्यामध्ये चार वेळा सभा घेण्यात आली. परंतु यामध्ये लोकप्रतिनिधींनी आयुक्तांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मे महिन्यापासून आयुक्तांनी सुरू केलेल्या धडक कारवाईचा फटका अनेकांना बसू लागला होता. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. काहींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आयुक्त लोकप्रतिनिधींना वेळ देत नाहीत. नगरसेवकांना विश्वासात घेतले जात नसल्यामुळे असंतोष निर्माण होवू लागला होता. लक्षवेधीच्या निमित्ताने सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर टीका केली. आयुक्तांची मनमानी सुरू आहे. हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. लोकशाही प्रणालीचा आदर केला पाहिजे यासह पक्षपाती कारवाईचे आरोपही करण्यात आले. एका सभेला आयुक्त आले नसल्याचे कारण देवून सभा तहकूब करण्यात आली. वास्तविक २३ आॅगस्टला झालेल्या पाणीप्रश्नावरील सभेत दिवसभर चर्चा झाल्यानंतर आयुक्तांनी फक्त दोन मिनिटच निवेदन केले. कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही.नवी मुंबईमध्ये मे महिन्यापासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कामाचीच चर्चा सुरू झाली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर केलेली कारवाई, पाणीप्रश्न व आंबेडकर स्मारकाला मार्बल लावण्याचे रद्द करण्याच्या निर्णयाविषयी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्याचबरोबर फेरीवाल्यांवर केलेली कारवाई, प्रशासनामधील बेशिस्तपणा मोडीत काढण्यामुळे त्यांच्या कामाचे कौतुकही झाले. परंतु लोकप्रतिनिधींना वेळ दिला जात नसल्यामुळे व आमदार मंदा म्हात्रे यांच्याशी झालेल्या वादासह महापौर सुधाकर सोनावणे यांच्या पत्रालाही उत्तर न देण्यामुळे नगरसेवकांमधील नाराजी वाढली. आयुक्तांनीही सर्वांना विश्वासात घ्यावे व लोकप्रतिनिधींनी फक्त कुरघोडीसाठी टीका करू नये अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.>महासभेत प्रलंबित धोरणात्मक प्रस्ताव शहरातील मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्राच्या सहाय्याने सर्वेक्षण करणे स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होणे दिव्यांग मुलांसाठी विविध योजना राबविणे खेळाडूंना शिष्यवृत्ती मंजूर करणे शहराचा विकास आराखडा तयार करणे विकास आराखडा नगररचना विभागाकडून तयार करण्यास संमती