शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

विषारी दारूने घेतले १३ बळी!

By admin | Updated: June 19, 2015 03:40 IST

विषारी दारू प्यायल्याने मालाडच्या मालवणी परिसरात १३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर

मुंबई : विषारी दारू प्यायल्याने मालाडच्या मालवणी परिसरात १३ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. यातील ११ जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. बळींची संख्या वाढण्याची भीती आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने राजू लंगडा व शंकर या दोन दारू विक्रेत्यांना ताब्यात घेतले. लक्ष्मीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात बिगारी कामगार, मजूर आणि रोजंदारीवर काम करणारे कुटुंबीय राहतात. बुधवारी रात्री येथील नागरिकांनी गावठी दारूचे प्राशन केले. गुरुवारी पहाटेपासून त्यांची प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. अनेकांना उलट्या-जुलाब, छातीत दुखणे, चक्कर येणे असा त्रास होऊ लागला. त्यांना मालाडच्या खाजगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना विषबाधा झाल्याचे निदान डॉक्टरांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. अकरापैकी तिघांचा मृत्यू प्राईम रुग्णालयात, ५ जणांचा शताब्दी रुग्णालयात, एकाचा सिद्धार्थ रुग्णालयात तर ४ जणांचा पालिका रुग्णालयात मृत्यू झाला. ११ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलिसांसह गुन्हे शाखेनेही घटनास्थळी धाव घेतली. इथिल अल्कोहोलपासून ही विषारी दारू बनविण्यात आल्याची माहिती समोर आली. सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी सांगितले की, उपचार घेणाऱ्या नागरिकांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. तसेच याचा अधिक तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती, उत्तर परिक्षेत्राचे अप्पर आयुक्त फत्तेसिंह पाटील रात्री उशिरापर्यंत मालवणी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याचे पाटील यांनी लोकमतला सांगितले.पोलिसांचे कोम्बिंग आॅपरेशन-मालवणी खारोडी गावातल्या गावदेवी परिसरातील लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसरात लंगडा, शंकर हे दोघे गेल्या अनेक वर्षांपासून देशी-गावठी दारू विक्रीचा व्यवसाय करत होते. -देशी दारूच्या बाटल्या फोडून त्या छोट्या छोट्या पाऊचमध्ये ते विकत असल्याची माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे विक्री करताना ते दारूत मिथेनॉल किंवा मिथाईल हे औद्योगिक रसायन मिसळून विकत असावेत, असा संशय आहे. पोलिसांनी हस्तगत केलेल्या दारूचे नमुने कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी धाडण्यात आले आहेत.-या घटनेनंतर पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी तत्काळ या घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने कोम्बिंग करून संशयितांना ताब्यात घेतले.वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई?मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांच्यावर या दारूकांडानंतर तरी आयुक्त मारिया कारवाई करणार का, असा सवाल निर्माण झाला आहे. २००४मध्ये विक्रोळी व ना. म. जोशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दारूकांड घडल्यानंतर वरिष्ठ निरीक्षकापासून उपायुक्तांपर्यंत सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी राजू लंगडा व शंकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सर्वांनी नेमकी कोणती दारू प्यायली, ती कुठून आली, याबाबतची माहिती गोळा केली जात आहे.- धनंजय कुलकर्णी, पोलीस प्रवक्तेमृतांची नावे : मेहबूब हुसेन शेख (४३), दिनेश कनोजिया (४०), दत्तात्रय धोंडे घमरे (५३),कन्हेही सकाई हरिजन (४०), रोहित दगडू भालेराव (२४), लक्ष्मण येमापुरे (४०), अशोक हरिश खेमाडी(२५), रमेश रामतेकर(४०), सत्यवान भिकू म्हात्रे (४०), विजय रवी गजाला (२७), प्रमोद चव्हाण, किसन सोनवणे, देविड आरोग्यस्वामी चेट्टीयार.यांच्यावर उपचार सुरू : पॉल चेट्टीयार (६२), दयानंद मोहिते (३६), प्रदीप गालांडे (३०), फुलचंद गुलाब कनोजिया, अब्दुल अजिज शेख हुसेन (४५), कमलेश रामदुलार कनोजिया (३८), बबलू सुधाकर गालाते (३३), अशोक कनोजिया, दत्ता जयंत सोनावणे, मोहन कांचन शिंदे (३०)