शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची १३ हजार पदे रिक्त

By admin | Updated: December 21, 2015 01:55 IST

पोलीस दलाच्या मंजूर मनुष्यबळातील रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी २ लाख २० हजार पोलिसांवर आहे

जमीर काझी, मुंबईपोलीस दलाच्या मंजूर मनुष्यबळातील रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. राज्यातील ११ कोटींहून अधिक जनतेच्या संरक्षणाची जबाबदारी २ लाख २० हजार पोलिसांवर आहे. पोलिसांचा फौजफाटा मंजूर असला, तरी त्यापैकी तब्बल १३ हजार ८५ पदे रिक्त असल्याचे वास्तव समोर आले आहे. सर्वाधिक रिक्त पदांपैकी तब्बल ५ हजार १५ जागा प्रत्यक्ष तैनात राहणाऱ्या कॉन्स्टेबलच्या आहेत. बदल्यांच्या अधिकारासंदर्भातील धोरणांची गेल्या वर्षापासून अंमलबजावणी करण्यात येत आहे. तरीदेखील प्रत्यक्षात गृहविभागाचा कारभार मात्र पूर्वीप्रमाणेच सुरू असल्याची चर्चा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्तुळात आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा ताण येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाचा आढावा घेण्यासाठी १ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी ‘लोकमत’ने मिळविलेली आहे. पोलीस महासंचालक (डीजीपी) पासून कॉन्स्टेबलपर्यंत विविध १३ दर्जाची पदे आहेत. पैकी अप्पर महासंचालकांची ३० पैकी २४ पदे भरलेली आहेत. विशेष महानिरीक्षक ४१ पैकी ३५ जागा, तर उपमहानिरीक्षकाच्या ३७ पैकी २७, उपायुक्त/ अधीक्षकाच्या २६७ पैकी २३५ पदावर अधिकारी कार्यरत आहेत. एसीपी/डीवायएसपीची ६९० पदे मंजूर असून, सध्या ४९५ ठिकाणी अधिकारी कार्यरत आहेत. निरीक्षकांच्या ३४६६ पैकी ३२१० पदे भरलेली आहेत. एपीआयच्या ४४४१ पैकी ३८९० कार्यरत आहेत. पीएसआयच्या ९६८७ पैकी तब्बल २७८५पदे रिक्त आहेत. काही गुन्ह्यांच्या तपास कामाचे अधिकार असलेल्या सहायक फौजदार व हवालदाराची अनुक्रमे १८ हजार ८०४ व ४२ हजार ९६४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी १७,३२५ व ४१,००२ पदे कार्यरत आहेत. नाईक व शिपाईसाठी अनुक्रमे ४१ हजार ४३५ व ९६ हजार २४० जागा आहेत. त्यापैकी अनुक्रमे ४१ हजार ९३ व ९२ हजार २२५ कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त अहमद जावेद हे जानेवारी अखेरीस सेवानिवृत्त होत आहेत. केंद्र सरकारने त्यांची सौदी अरेबियाच्या राजदूत पदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे पुढील महिनाअखेरीस त्यांनी कार्यभार सोडल्यानंतर, दोन टप्प्यात एडीजी व आयजीची पदेही भरली जातील. त्याचप्रमाणे, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुमारे १५० निरीक्षकांना बढती दिली जाईल, असे गृहविभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले.चार महिन्यांत हजार पदे रिक्तपोलीस दलात गेल्या आॅगस्ट महिन्यात १२ हजार जागा रिक्त असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यानंतर गेल्या चार महिन्यांच्या काळात नवीन भरती झालेली नाही. तथापि, सुमारे एक हजारांवर अधिकारी व कर्मचारी निवृत्त झाले आहेत.