शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलमध्ये रोज १३ रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: June 23, 2014 01:22 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत

१५ महिन्यांत ५,९५२ रुग्णांचा मृत्यूनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे रु ग्णालय म्हणून मेडिकलचे स्थान आहे. या रुग्णालयात नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह मध्य भारतातूनही हजारोंच्या संख्येने रु ग्ण उपचारासाठी येतात. मेडिकलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा भरणा असल्याने, रु ग्णालयात दारिद्र्य रेषेखालील, गरीब व श्रीमंत रु ग्णही मोठ्या प्रमाणात येतात. या रु ग्णांमध्ये वेगवेगळ्या सौम्य व जटील आजाराचे रु ग्ण असतात. तसेच विविध अपघातांमधील सामान्य व गंभीररीत्या जखमी रु ग्णांचे मेडिकलमध्ये प्रमाण जास्त असते. याशिवाय खून, गंभीररीत्या जखमी होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक असते. विशेष म्हणजे, शहरात खासगी इस्पितळांची संख्या वाढली असतानाही मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. जानेवारी २०१३ ते मार्च २०१४ या १५ महिन्यांत ७ लाख २१ हजार ५४३ रुग्णांनी उपचार घेतला. याच कालावधीत आंतररुग्णांची संख्या ८५ हजार ७७७ रुग्ण एवढी आहे. ही संख्या जवळपास स्थिर असली तरी मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी २०१३ मध्ये ३५० रुग्णांचा मृत्यू झाला, तर मार्च २०१४ मध्ये ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला. या १५ महिन्याच्या कालावधीत एकूण ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी टाकलेल्या माहितीच्या अधिकारात ही सत्य स्थिती उजेडात आली आहे. मेडिकलमध्ये वाढत्या मृत्यूबाबत एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, खासगी रुग्णालयात एखादा रुग्ण गंभीर झाल्यास किंवा औषधोपचारासाठी त्याच्याकडील पैसे संपल्यास अशा रुग्णांना थेट मेडिकलमध्ये पाठविले जाते. यात गंभीर रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. मागील दोन-तीन वर्षांत याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दिवसाला सरासरी १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.(प्रतिनिधिी)