शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

मेडिकलमध्ये रोज १३ रुग्णांचा मृत्यू

By admin | Updated: June 23, 2014 01:22 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत

१५ महिन्यांत ५,९५२ रुग्णांचा मृत्यूनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील १५ महिन्यांत ८५ हजार ७७७ रुग्णांना भरती करण्यात आले. यातील ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसाकाठी सरासरी १३ रुग्णांचा मृत्यू होत असल्याचे या आकडेवारीवरून समोर आले आहे. मध्य भारतातील सर्वात मोठे रु ग्णालय म्हणून मेडिकलचे स्थान आहे. या रुग्णालयात नागपूर, विदर्भ, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांसह मध्य भारतातूनही हजारोंच्या संख्येने रु ग्ण उपचारासाठी येतात. मेडिकलमध्ये अत्याधुनिक सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टरांचा भरणा असल्याने, रु ग्णालयात दारिद्र्य रेषेखालील, गरीब व श्रीमंत रु ग्णही मोठ्या प्रमाणात येतात. या रु ग्णांमध्ये वेगवेगळ्या सौम्य व जटील आजाराचे रु ग्ण असतात. तसेच विविध अपघातांमधील सामान्य व गंभीररीत्या जखमी रु ग्णांचे मेडिकलमध्ये प्रमाण जास्त असते. याशिवाय खून, गंभीररीत्या जखमी होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक असते. विशेष म्हणजे, शहरात खासगी इस्पितळांची संख्या वाढली असतानाही मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. जानेवारी २०१३ ते मार्च २०१४ या १५ महिन्यांत ७ लाख २१ हजार ५४३ रुग्णांनी उपचार घेतला. याच कालावधीत आंतररुग्णांची संख्या ८५ हजार ७७७ रुग्ण एवढी आहे. ही संख्या जवळपास स्थिर असली तरी मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी २०१३ मध्ये ३५० रुग्णांचा मृत्यू झाला, तर मार्च २०१४ मध्ये ३७५ रुग्णांचा मृत्यू झाला. या १५ महिन्याच्या कालावधीत एकूण ५ हजार ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. माहिती अधिकारी कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी टाकलेल्या माहितीच्या अधिकारात ही सत्य स्थिती उजेडात आली आहे. मेडिकलमध्ये वाढत्या मृत्यूबाबत एका वरिष्ठ डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, खासगी रुग्णालयात एखादा रुग्ण गंभीर झाल्यास किंवा औषधोपचारासाठी त्याच्याकडील पैसे संपल्यास अशा रुग्णांना थेट मेडिकलमध्ये पाठविले जाते. यात गंभीर रुग्णांची संख्या सर्वाधिक असते. मागील दोन-तीन वर्षांत याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे दिवसाला सरासरी १३ रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे.(प्रतिनिधिी)