शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

बारावी उत्तीर्णांना १० सप्टेंबरपर्यंत प्रवेश

By admin | Updated: August 30, 2016 06:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश द्यावेत, असे सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना राज्य शासनातर्फे नुकतेच कळविण्यात आले आहे. दहावी- बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने सप्टेंबर- आॅक्टोबरऐवजी जुलै- आॅगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सहज प्रवेश घेता येणार आहे. मात्र, बारावीचा निकाल जाहीर होऊन चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही प्रवेशाबाबत शासनाकडून काहीच सांगितले जात नव्हते. शासनाकडून कोणताही लेखी पत्रव्यवहार न झाल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे विद्यापीठातील अधिकारी व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात होते. परंतु, राज्य शासनाचे उपसचिव सिद्धार्थ खरात यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना महाविद्यालयांच्या प्रवेशाची तारीख १० सप्टेंबरपर्यंत वाढवावी,असे पत्र पाठविले आहे. राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी याबाबत सांगितलेकी, बारावीच्या फेरपरीक्षेतउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी१० सप्टेंबरपर्यंत कार्यवाही करण्यात यावीतसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याची दक्षता विद्यापीठांनी घ्यावी, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)