शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

बारावी उत्तीर्णांना १० सप्टेंबरपर्यंत प्रवेश

By admin | Updated: August 30, 2016 06:08 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १० सप्टेंबरपर्यंत विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमास प्रवेश द्यावेत, असे सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना राज्य शासनातर्फे नुकतेच कळविण्यात आले आहे. दहावी- बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या उद्देशाने राज्य शासनाने सप्टेंबर- आॅक्टोबरऐवजी जुलै- आॅगस्टमध्ये फेरपरीक्षा घेतली. अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सहज प्रवेश घेता येणार आहे. मात्र, बारावीचा निकाल जाहीर होऊन चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटून गेला तरीही प्रवेशाबाबत शासनाकडून काहीच सांगितले जात नव्हते. शासनाकडून कोणताही लेखी पत्रव्यवहार न झाल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही, असे विद्यापीठातील अधिकारी व महाविद्यालयांच्या प्राचार्यांकडून सांगितले जात होते. परंतु, राज्य शासनाचे उपसचिव सिद्धार्थ खरात यांनी सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना महाविद्यालयांच्या प्रवेशाची तारीख १० सप्टेंबरपर्यंत वाढवावी,असे पत्र पाठविले आहे. राज्याच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. धनराज माने यांनी याबाबत सांगितलेकी, बारावीच्या फेरपरीक्षेतउत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमास प्रवेश देण्यासाठी१० सप्टेंबरपर्यंत कार्यवाही करण्यात यावीतसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याची दक्षता विद्यापीठांनी घ्यावी, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)