मोफत पुस्तके अन् गणवेश : राजेंद्र दर्डा यांची घोषणा
मुंबई : राज्यातील शाळा 16 जूनपासून सुरू होत असून त्या निमित्त प्रवेशोत्सव साजरा करून त्याच दिवशी 1 कोटी 28 लाख विद्याथ्र्याना मोफत गणवेश आणि मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज विधानसभेत सांगितले.
शालेय शिक्षण विभागाच्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना दर्डा यांनी सांगितले की, मध्यान्ह भोजन तयार करणो आणि वाटप या कामात शिक्षक वा विद्याथ्र्याचा वापर करणा:या शाळांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. राज्यातील 8 हजार शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा उभारण्यात आल्या असून 55 हजार शाळांना संगणक पुरविण्यात आले आहेत.
बारावीच्या परीक्षेत राज्य बोर्डाच्या विद्याथ्र्याना इंटरनलचे 2क् टक्के गुण मिळतात. त्यामुळे निकालाची टक्केवारी वाढते या मुद्याबाबत राजेंद्र दर्डा यांनी स्पष्ट केले की सीबीएसई बोर्डात इंटरनलचे 4क् टक्के गुण दिले जातात. थिअरीमध्ये जास्तीत जास्त गुण राज्य बोर्डाच्या विद्याथ्र्याना मिळावेत यासाठी लक्ष दिले जाईल, असे ते
म्हणाले. थिअरीच्या गुणांमध्ये अधिक वाढ व्हावी अशी अपेक्षा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी या निमित्ताने व्यक्त केली.
वेतनेतर अनुदान, नवीन शाळांना परवानगी आदींबाबत चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी काही आरोप केले होते. दर्डा
यांनी या संदर्भात सांगितले की, गेल्यावर्षी 266 कोटी रुपयांचे
वेतनेतर अनुदान देण्यात आले.
अनेक वर्षे ते देण्यातच येत नव्हते. बृहत आराखडय़ानुसार 144
गावांसाठी शाळांचे अर्ज आणि त्यानंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात प्रकरणाचा निकाल लवकर
लागून यंदाच या शाळा सुरू
व्हाव्यात हा शासनाचा प्रय} आहे.
उर्दू शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांचा आराखडा तयार करण्यात
आला आहे.
चर्चेमध्ये सुभाष देसाई, लक्ष्मणराव ढोबळे, नवाब मलिक,शिशिर शिंदे, प्रकाश शेंडगे, आदी सदस्यांनी भाग घेतला.
पोस्टमार्टेमची 24 तास व्यवस्था - जितेंद्र आव्हाड
च्राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये पोस्टमार्टेमची 24 तास व्यवस्था केली जाईल, अशी घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या विभागाच्या चर्चेला उत्तर देताना सांगितले.
च्अक्कलकोटच्या (जि.सोलापूर)रस्ते विकासासाठी दीड कोटी रुपये देण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी केली.
च्चर्चेला सुरुवात करताना विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी राज्य शासनाच्या 1क्3 महाघोटाळ्यांची माहिती आपण वारंवार देत आहोत पण त्याची दखल घेतली जात नाही, अशी टीका केली. त्यावर, अधिवेशन संपण्याआधी त्यांचे उत्तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण देऊ, असे उदय सामंत म्हणाले. मुख्यमंत्री या प्रकरणांवर मौन बाळगून भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप खडसे यांनी केला होता.