शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

राज्याला सिंचनासाठी १२,७७३ कोटींचे कर्ज

By admin | Updated: September 7, 2016 06:10 IST

महाराष्ट्रातील २६ महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार नाबार्डमार्फत १२ हजार ७७३ कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे

मुंबई : महाराष्ट्रातील २६ महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार नाबार्डमार्फत १२ हजार ७७३ कोटी रुपयांचे कर्ज देणार आहे. यासंदर्भात आज नवी दिल्लीमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला. केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, छत्तीसगडचे जलसंपदा ब्रजमोहन अग्रवाल आणि तेलंगणाचे जलसंपदा मंत्री टी. हरीश राव यांच्या प्रमुख उपस्थितीत नाबार्डचे अध्यक्ष आणि केंद्रीय जलसंपदा सचिवांनी करारावर स्वाक्षरी केली. महाराष्ट्रातील २६ प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण ३६ हजार २९९ कोटी रुपये खर्च येणार आहेत. त्यातील २३ हजार ५२६ कोटी रुपयांची उभारणी ही केंद्र आणि राज्य सरकार मिळून ६०:४० या प्रमाणात करण्यात येणार आहे. उर्वरित १२ हजार ७७३ कोटी रुपये केंद्र सरकारने उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उमा भारती यांच्याकडे केली होती. ही रक्कम नाबार्डच्या मार्फत ५ ते ६ टक्के व्याजदरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय केंद्राने घेतला. महाराष्ट्राने दिलेला हा फॉर्म्युला आता देशातील अन्य सिंचन प्रकल्पांसाठीदेखील केंद्राने स्वीकारला आहे. त्यानुसार देशातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एकूण ७७ हजार ५९५ कोटी रुपये विविध राज्यांना उपलब्ध होणार आहेत. हे २६ प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील एकूण ८ लाख ५० हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांना मिळणार निधीवाघूर (जि. जळगाव), बावनथडी (भंडारा), निम्न दुधना (जालना), तिलारी (सिंधुदुर्ग),निम्न वर्धा (वर्धा), निम्न पांझरा (धुळे), नांदुर मध्यमेश्वर टप्पा २ (अहमदनगर), गोसीखुर्द (भंडारा), ऊर्ध्व पैनगंगा (यवतमाळ), बेंबळा (यवतमाळ), तारळी (सातारा), धोमबलकवडी (सातारा), अर्जुना (सिंधुदुर्ग), ऊर्ध्व कुंडलिका (बीड) अरुणा (सिंधुदुर्ग), कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजना (सातारा-सांगली), गडनदी (रायगड), डोंगरगाव (नाशिक), सांगोला शाखा कालवा (सोलापूर), खडकपूर्णा (हिंगोली), वारणा (कोल्हापूर), मोरणा-गुऱ्हेघर (रत्नागिरी), निम्न पेढी (अमरावती), वांग (सातारा), नरडवे (महमद वाडी), कुडाळी (सिंधुदुर्ग)