शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
4
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
8
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
9
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
10
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
11
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
12
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
13
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
14
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
15
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
16
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
17
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
18
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
19
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
20
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO

राज्यातील १२७ शाळांत शिक्षणाच्या अधिकाराला पोषक वातावरण नाही

By admin | Updated: January 7, 2017 05:09 IST

शिक्षण अधिकार कायद्याची राज्यात चोखपणे अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले.

मुंबई : लहान मुलांचा शिक्षण हा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना मिळण्यासाठी शिक्षण अधिकार कायद्याची राज्यात चोखपणे अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले. पण, शाळेत पायाभूत सुविधा नाहीत, शिक्षक नाहीत त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असल्याचे बाल हक्क अभियानातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांतील १२७ शाळांचे बाल हक्क अभियानाने क्रायबरोबर सर्वेक्षण केले. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. १२७ शाळांपैकी ६४ म्हणजे ५० टक्के शाळांत पहिली ते चौथीसाठी फक्त दोन वर्ग खोल्या उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. तर, फक्त १८ शाळांत ५ खोल्या आढळून आल्या. ९४ टक्के शाळांमध्ये ग्रंथालय नाही. सहा जिल्ह्यांतील १५० शिक्षकांच्या जागा मंजूर आहेत. पण, त्यापैकी फक्त १०१ शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. ३२.६७ टक्के शिक्षकांच्या जागा अजूनही रिक्त आहेत. शाळांत पायाभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. २८ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी नळाची सोय नाही. ४३ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपाचा उपयोग केला जातो. तर, ९ टक्के शाळांत विहीर आणि कूपनलिका आहेत. १३ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी अन्य स्रोतांचा वापर केला जातो. २९ टक्के शाळांना कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. ९० टक्के शाळांमध्ये शौचालयासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. शाळांच्या अशा परिस्थितीमुळे शिक्षणाचा अधिकार मुलांना कसा मिळणार, असा प्रश्न अभियानातर्फे उपस्थित करण्यात आला आहे. सर्व मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी असल्याचे अभियानाचे राज्य निमंत्रक सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)