शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राज्यातील १२७ शाळांत शिक्षणाच्या अधिकाराला पोषक वातावरण नाही

By admin | Updated: January 7, 2017 05:09 IST

शिक्षण अधिकार कायद्याची राज्यात चोखपणे अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले.

मुंबई : लहान मुलांचा शिक्षण हा अधिकार आहे. हा अधिकार त्यांना मिळण्यासाठी शिक्षण अधिकार कायद्याची राज्यात चोखपणे अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले. पण, शाळेत पायाभूत सुविधा नाहीत, शिक्षक नाहीत त्यामुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागत असल्याचे बाल हक्क अभियानातर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. राज्यातील सहा जिल्ह्यांतील १२७ शाळांचे बाल हक्क अभियानाने क्रायबरोबर सर्वेक्षण केले. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. १२७ शाळांपैकी ६४ म्हणजे ५० टक्के शाळांत पहिली ते चौथीसाठी फक्त दोन वर्ग खोल्या उपलब्ध असल्याचे समोर आले आहे. तर, फक्त १८ शाळांत ५ खोल्या आढळून आल्या. ९४ टक्के शाळांमध्ये ग्रंथालय नाही. सहा जिल्ह्यांतील १५० शिक्षकांच्या जागा मंजूर आहेत. पण, त्यापैकी फक्त १०१ शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत. ३२.६७ टक्के शिक्षकांच्या जागा अजूनही रिक्त आहेत. शाळांत पायाभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचे या सर्वेक्षणातून उघड झाले आहे. २८ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी नळाची सोय नाही. ४३ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी हातपंपाचा उपयोग केला जातो. तर, ९ टक्के शाळांत विहीर आणि कूपनलिका आहेत. १३ टक्के शाळांत पिण्याच्या पाण्यासाठी अन्य स्रोतांचा वापर केला जातो. २९ टक्के शाळांना कोणत्याही प्रकारचे कुंपण नसल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. ९० टक्के शाळांमध्ये शौचालयासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. शाळांच्या अशा परिस्थितीमुळे शिक्षणाचा अधिकार मुलांना कसा मिळणार, असा प्रश्न अभियानातर्फे उपस्थित करण्यात आला आहे. सर्व मुलांना शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून सरकारने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी असल्याचे अभियानाचे राज्य निमंत्रक सुधाकर क्षीरसागर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)