शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
2
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
3
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
4
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
6
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
7
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
8
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
9
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
10
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
11
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
12
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
13
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
14
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
15
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे
16
कांदा आणखी स्वस्त होणार; आंतरराष्ट्रीय आणि महाराष्ट्रातील तीन कारणे ठरणार भाव?
17
Crime: "तो माझी लैंगिक इच्छा पूर्ण करत नव्हता" पतीची हत्या केलेल्या पत्नीची पोलिसांत कबूली!
18
गुरुपुष्यामृतयोगात आषाढ अमावास्या: पूजन करताना चुकून दिवा विझणे अशुभ मानतात का? काय करावे?
19
Myntra ला ईडीचा मोठा धक्का! १६५४ कोटींच्या 'फेमा' उल्लंघनाचा आरोप, होलसेलच्या नावाखाली करत होते 'हे' काम
20
विमान अपघातानंतर ब्रिटनमधल्या कुटुंबांना पाठवले दुसऱ्यांचेच मृतदेह; अनेकांनी अंत्यसंस्कारही केले

देशातील १२५ कोटी जनता पंतप्रधानांच्या निर्णयाची शिक्षा भोगतेय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: November 15, 2016 08:11 IST

५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर शिवसेनेकडून सातत्याने आगपाखड सुरु असून आजही सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर..

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १५ - ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर शिवसेनेकडून सातत्याने आगपाखड सुरु असून आजही सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर उपरोधिक टीका करण्यात आली आहे. सीमेवरील जवान आणि बँकांच्या रांगेत उभे असलेले सामान्य नागरीक देशहिताची किंमत मोजतायत त्यासाठी पंतप्रधानांनी स्वत:ला शिक्षा करुन घेण्याची अजिबात गरज नाही असा टोला उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून लगावला आहे. 
 
देशातील १२५ कोटी जनता पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा भोगत आहे. राष्ट्रभक्तीची शिक्षा फक्त जनताच भोगत असते व देशासाठी त्यागही फक्त जनताच करीत असते असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. या निर्णयानंतर विरोधक आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करतील असे मोदी सांगत असले तरी, पंतप्रधान मोदी हे जगातील अभेद्य अशा सुरक्षा व्यवस्थेत आहेत व ही सुरक्षा व्यवस्था भेदून डासही त्यांना चावू शकत नाही असे उद्धव यांनी म्हटले आहे. 
 
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांना देशासाठी घेतलेल्या निर्णयाची किंमत प्राणांचे मोल देऊन चुकवावी लागली. मोदींनी फक्त नोटाच बदलल्या आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
 
- नोटा बदलणे म्हणजे पाकिस्तानवर हल्ला नाही किंवा हाफीज सईदला फरफटत आणून दिल्लीच्या इंडिया गेटसमोर फासावर लटकवणे नाही. त्यामुळे सध्या तरी दहशतवाद्यांकडून कुणालाच भीती नाही. भीती आहे ती सामान्य नागरिकांना. देशहिताची किंमत मोजत आहेत ते सीमेवरील जवान आणि बँकांच्या रांगेत उभे असलेले सामान्य लोक. पंतप्रधानांनी स्वत:ला शिक्षा करून घेण्याची अजिबात गरज नाही. मरोत मोदींचे दुश्मन. मोदींना आणखी शंभर वर्षे ठणठणीत आरोग्याचे आयुष्य लाभो अशी आम्ही आई जगदंबेकडे प्रार्थना करीत आहोत.
 
- पंतप्रधान मोदी यांनी अत्यंत भावुक वगैरे होऊन सांगितले आहे की, देशातून भ्रष्टाचार साफ करण्यासाठी मला आणखी ५० दिवस द्या. सर्व सफाई झाली नाही तर भरचौकात उभे करून मला शिक्षा द्या! पंतप्रधानांना असे काही करण्याची अजिबात गरज नाही. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाची शिक्षा देशातील १२५ कोटी जनता भोगत आहे तेवढी पुरेशी आहे. राष्ट्रभक्तीची शिक्षा फक्त जनताच भोगत असते व देशासाठी त्यागही फक्त जनताच करीत असते. 
 
- पंतप्रधान हे बेडर आणि निडर आहेत, तरीही त्यांनी असे सांगितले आहे की, काळा पैसा आणि भ्रष्टाचाराबाबत कठोर निर्णय घेतल्यामुळे विरोधक आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न करतील, संपवण्याचा प्रयत्न करतील. छे, छे, असे काहीच घडणार नाही. मरोत मोदींचे दुश्मन. मोदींना आणखी शंभर वर्षे ठणठणीत आरोग्याचे आयुष्य लाभो अशी आम्ही आई जगदंबेकडे प्रार्थना करीत आहोत. पंतप्रधान मोदी हे जगातील अभेद्य अशा सुरक्षा व्यवस्थेत आहेत व ही सुरक्षा व्यवस्था भेदून डासही त्यांना चावू शकत नाही, हे काय देशवासीयांना माहीत नाही! 
 
- बलिदान दिले ते असंख्य स्वातंत्र्य योद्ध्यांनी. खलिस्तान्यांना खतम करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुवर्ण मंदिरात सरळ सैन्य घुसवून देशद्रोह्यांशी युद्ध पुकारले. त्याची किंमत प्राणांचे मोल देऊन इंदिरा गांधी यांना चुकवावी लागली. पंतप्रधानांच्या निवासस्थानी शीख सुरक्षा रक्षकांनीच त्यांना गोळ्या घातल्या. राजीव गांधींचा श्रीलंकेत शांती सैन्य पाठविण्याचा निर्णय वादग्रस्त असेलही, पण देशासाठी घेतलेल्या निर्णयाची किंमत राजीव गांधींना प्राणाचे मोल देऊनच चुकवावी लागली. मोदी यांनी फक्त नोटाच बदलल्या आहेत.
 
- नोटा बदलणे म्हणजे पाकिस्तानवर हल्ला नाही किंवा हाफीज सईदला फरफटत आणून दिल्लीच्या इंडिया गेटसमोर फासावर लटकवणे नाही. त्यामुळे सध्या तरी दहशतवाद्यांकडून कुणालाच भीती नाही. भीती आहे ती सामान्य नागरिकांना. देशहिताची किंमत मोजत आहेत ते सीमेवरील जवान आणि बँकांच्या रांगेत उभे असलेले सामान्य लोक. पंतप्रधानांनी स्वत:ला शिक्षा करून घेण्याची अजिबात गरज नाही व लोकांना होणारा त्रास सरकारने फारसा मनास लावून घेण्याची गरज नाही. 
 
- महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बँकांच्या बाहेर चेंगराचेंगरी, हाणामार्‍या झाल्याने पोलिसांना लाठीमार करावा लागला. नशीब इतकेच की, जनता संयमी आहे. त्यामुळे पोलिसांना फक्त सौम्य लाठीमार करावा लागला. कुठे इस्पितळात रुग्ण दगावले, कुठे महिलावर्ग, वृद्ध रांगेत मूर्च्छा येऊन पडले. हे सर्व सहन करण्याइतकी आपली जनता शांत, संयमी असल्याने पंतप्रधानांनी स्वत:च्या जीविताची काळजी करू नये. हजारो देशभक्तांनी कोणताही गाजावाजा न करता फासाचा दोर हसत हसत मानेभोवती लपेटून घेतला व त्यामुळेच देश आज टिकून आहे. देशासाठी बलिदान करण्याची वेळ आलीच तर आजही लाखो तरुण डोक्यास कफन बांधून रस्त्यावर उतरतील व देशाच्या दुश्मनांचे गळे चिरायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.