शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाऱ्यां शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न !

By सुरेश लोखंडे | Updated: December 8, 2017 19:06 IST

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अ‍ॅट्याक येऊन मरतील . देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ कोटींची कर्जमाफी देण्यात ...

ठळक मुद्देदलितांच्या महामंडळांचे सुमारे ८०० कोटींच्या कर्जमाफी जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यातसंविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अ‍ॅट्याक येऊन मरतील. देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली असून टप्याटप्याने त्याचा लाभा शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यांनी स्पष्ट केले.ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यांसाठी आठवले आले असता ते शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत बोलत होते. शेतकऱ्यांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांचे सुमारे ८०० कोटींच्या कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करीत असल्याचे त्यांनी यावेळी सुतोवाच केले. शेतीच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची ... तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी मिळाल्याचे त्यांनी हास्य विनाद करीत स्पष्ट केले.आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करीत... ते पुढे म्हणाले की दलितांचे मतदान निर्णाय ठरत असल्यामुळे आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहे... तसे उद्धवजीही मित्र ... पण या दोघातील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थिताना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोजिशन वाले मुसलमानो को भडकाते है... हो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढानेका काम करते है... असाही यमक जुळवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे त्यांनी पटवून दिले. आपण सर्व एकत्र राहून पाक व्यप्त काश्मीर मिळवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोट बंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्यचे सांगितात. पण जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशिर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित झालेले आमदार नरेंद्र पवार... यांची ओळख करून घेताना ते म्हणाले ... ‘मला वाटले शरद पवारांचे भाऊ नरेद्र पवार’ असल्याचे हास्य विनोद त्यांनी यावेळी करून उपस्थिताना खेळवत ठेवले.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक