शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाऱ्यां शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी प्रयत्न !

By सुरेश लोखंडे | Updated: December 8, 2017 19:06 IST

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अ‍ॅट्याक येऊन मरतील . देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ कोटींची कर्जमाफी देण्यात ...

ठळक मुद्देदलितांच्या महामंडळांचे सुमारे ८०० कोटींच्या कर्जमाफी जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यातसंविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान

सुरेश लोखंडेठाणे : शेतकरी अन्नधान्य पिकवत असल्यामुळे आपणास खायला मिळत आहे. आठ दिवस अन्न न मिळाल्यास कुटूंबे अ‍ॅट्याक येऊन मरतील. देशातील १२५ कोटी जनतेला जगवणाºया शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न सुरू आहेत. ३४ कोटींची कर्जमाफी देण्यात आली असून टप्याटप्याने त्याचा लाभा शेतकºयांना होईल. त्यांच्या मालाला हमीभाव देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी यांनी स्पष्ट केले.ठाणे जि.प. व पंचायत समित्यांच्या निवडणूक प्रचार दौऱ्यांसाठी आठवले आले असता ते शहापूर तालुक्यातील वासिंद येथील एका चौक सभेत बोलत होते. शेतकऱ्यांप्रमाणेच दलितांच्या महामंडळांचे सुमारे ८०० कोटींच्या कर्जमाफी करण्यासाठी राज्य शासन विचार करीत असल्याचे त्यांनी यावेळी सुतोवाच केले. शेतीच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी नदी जोड प्रकल्प हाती घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागाचा विकास होऊन परिणामी देशाचा विकास साधता येणार आहे. यासाठी केंद्र शासनाने नितीन गडकरी यांना नद्या जोडण्याची ... तर मला माणसे जोडण्याची जबाबदारी मिळाल्याचे त्यांनी हास्य विनाद करीत स्पष्ट केले.आमच्या मतांवर आम्ही पडतो... पण ताबडतोब उभे राहतो. पडून राहण्याची सवय आम्हाला नाही... असा विनोद करीत... ते पुढे म्हणाले की दलितांचे मतदान निर्णाय ठरत असल्यामुळे आमच्या पाठिंब्यावर पक्षाचे उमेदवार निवडून येत असल्याचे त्यांनी काही उदाहणे देऊन पटवून दिले. ‘देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहे... तसे उद्धवजीही मित्र ... पण या दोघातील बरे नाही चित्र’ असे यमक साधून या चौक सभेतील उपस्थिताना आठवलेंनी कविताही ऐकवल्या. अपोजिशन वाले मुसलमानो को भडकाते है... हो आपको लढाने का काम करते है... लेकिन हम आपको बढानेका काम करते है... असाही यमक जुळवून त्यांनी मोदी सरकार मुसलमानांच्या हिताचे असल्याचे त्यांनी पटवून दिले. आपण सर्व एकत्र राहून पाक व्यप्त काश्मीर मिळवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.जीएसटीमुळे थोडा त्रास झाला. पण त्यासाठी चांगल्या दोन सुधारणा झाल्या आहेत. आगामी या बजेटमध्ये त्यांचा समावेश होईल. नोट बंदीचा थोडा त्रास झाला. दलितांचे आरक्षण जाणार असे सांगून विरोधक दलितांमध्ये भीती घालत आहेत. बाबासाहेबांचे संविधान बदलणार असल्यचे सांगितात. पण जे बाबासाहेबांचे संविधान बदलतील, त्यांना बदलण्याची ताकद आमच्यात आहे. बाबासाहेबांच्या आशिर्वादामुळे... संविधानामुळे ओबीसीतील तेली समाजाचा मी पहिला पंतप्रधान झाल्याचे मोदी यांनी सभागृहात सांगून संविधान बदलता येणार नसल्याची ग्वाही दिल्याचे आठवले यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित झालेले आमदार नरेंद्र पवार... यांची ओळख करून घेताना ते म्हणाले ... ‘मला वाटले शरद पवारांचे भाऊ नरेद्र पवार’ असल्याचे हास्य विनोद त्यांनी यावेळी करून उपस्थिताना खेळवत ठेवले.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक